9 लाख रुपयांचं घबाड घेऊन नशीब चमकवलं, बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत जान्हवी किल्लेकरची मोठी खेळी

2 hours ago 1

बिग बॉस सीजन पाचचा ग्रँड फिनाले पार पडत आहे. या फिनालेत आता जसजसा वेळ पुढे सरकत आहे, तसतशी आता चुरस वाढताना दिसत आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेपर्यंत घरात आतापर्यंत 6 स्पर्धक होते. पण आता या फिनालेमध्ये पहिलं इलिमिनेशन कार्य पार पडलं आहे. 6 स्पर्धाकांपैकी 1 स्पर्धक आता बाद झाला आहे. ग्रँड फिनालेमध्ये अभिजीत सावंत, अंकिला वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक होते. अखेर ग्रँड फिनाले सुरु झाला आहे आणि या ग्रँड फिनालेमधून सहावा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. या सहावा स्पर्धक जान्हवी किल्लेकर आहे. पण जान्हवी किल्लेकर बाद झाली असली तरी 9 लाख रुपयांची बँग घेऊन ती घराबाहेर पडली आहे.

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत आज एक टास्क पार पडली. यावेळी सहाही स्पर्धकांना एक ऑफर देण्यात आली. सर्व स्पर्धकांना गेम सोडण्यासाठी 7 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. सर्व स्पर्धकांपैकी कुणीतरी एकाने गेम सोडला तर त्याला 7 लाख रुपये मिळतील, अशी ऑफर देण्यात आली. पण सर्व स्पर्धकांनी ती ऑफर नाकारली. यानंतर बिग बॉसने या टास्कमध्ये आणखी एक ट्विस्ट आणला. बिग बॉसने आणखी 9 लाख रुपये वाढवत जो स्पर्धक पळत जाऊन बझर वाजवेल तो स्पर्धक 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडेल, असं जाहीर करण्यात आलं.

बिग बॉसची ही ऑफर ऐकल्यानंतर जान्हवी आपल्या जागेवरुन बाहेर पडली. ती बझरच्या दिशेला गेली. ती बझर जवळ गेली आणि त्याला रडू आलं. यावेळी रितेश देशमुख यांनी तिला तिच्या रडण्यामागचं कारण विचारलं. यावेळी जान्हवी हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आपल्या डोळ्यांसमोर आपला प्रवास आठवत असल्याचं ती म्हणाली. आपण घरात सुरुवातीला वर्षा उसगांवकर आणि पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला. नंतर आपण बदललो. पण आपल्यावरती प्रेक्षकांचा असलेला रोष अजूनही पाहिजे तसा कमी झालेला नाही. त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं जान्हवीने स्पष्ट केली. यानंतर जान्हवीने बझर वाजवला आणि ती 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली.

यावेळी एक मजेशीर गोष्ट बघायला मिळाली. जान्हवीने बझर वाजवल्यानंतर रितेश देशमुख यांनी घरसोडून जाणाऱ्या किंवा बाद होणाऱ्या सहाव्या स्पर्धकाचं नाव सांगितलं. ते नाव जान्हवी किल्लेकर हिचंच निघालं. त्यामुळे जान्हवी किल्लेकर हिच्यासाठी 9 लाख रुपये घेण्याची डील फायदेशीर ठरली. त्यामुळे रितेश देशमुख यांनी आपण जान्हवी यांना टास्क क्वीन म्हटलं ते अतिशय योग्य असल्याचं मत यावेळी मांडलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article