आनंद दिघे यांचा घातपात झाला होता:संजय शिरसाठ यांचा आरोप, मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची केली मागणी

2 hours ago 1
आनंद दिघे यांना मारले होते. त्यांचा घातपात झाला होता, हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघेंवर उपचार सुरू होते, ते हॉस्पिटल कायम बंद का करण्यात आले, असा सवालही शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे दिघेंचा मृत्यू का झाला, याची चौकशी करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे. संजय शिरसाठ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिघे यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यात प्रत्येक जण दिघे यांचा घातपात झाल्याचा आरोप करतात. दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला, असा सवाल शिरसाठ यांनी केला आहे. दिघेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी यावेळी शिरसाठ म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून दिघे यांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी माझी मागणी असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. तसेच इतके वर्ष झाले ते हॉस्पिटल सुरू का झाले नाही, ही सर्वांच्या मनात शंका कायम आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये नेत्यांचे मृत्यू झाले आहेत, मात्र ते हॉस्पिटल कधीही बंद झाले नाहीत. मात्र इथेच असे का झाले, असा सवाल त्यांनी केला. धर्मवीर सिनेमावर केले भाष्य धर्मवीर सिनेमांमध्ये अनेक प्रकरणातील वास्तव मांडण्यात आले आहेत. मात्र विरोधकांना कुठल्या गोष्टींची माहिती नसल्यामुळे त्यांच्या पोटात पोटसुळ उठला असल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला आहे. हेही वाचा... मविआचा MIM ला वंचितसारखे खेळवण्याचा प्रयत्न:संजय शिरसाट यांचा आरोप, संजय राऊत मूर्खांच्या नंदनवनात वावरत असल्याचा दावा लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने जसे खेळवले आणि शेवटपर्यंत आघाडी केलीच नाही त्याच पद्धतीने आता खेळी केली जात असल्याचा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. केवळ आपली मुस्लिम समाजाची मते पुन्हा कायम ठेवण्यासाठी आघाडीची बोलणी करत असल्याचे दाखवत आहे. अशी टीका महाविकास आघाडीवर टीका केली. सविस्तर बातमी वाचा... शिंदे गटात मंत्रीपदावरून घमासान:एका आमदारामुळे माझे मंत्रीपद हुकले, गोगावलेंचा आरोप; तो मी नव्हेच, संजय शिरसाट यांचा दावा मला मंत्रिपद मिळत असताना एका आमदाराने राजीनामा देण्याची धमकी दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. आता हा रोख नेमका कोणाकडे आहे यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आमदार भरत गोगावले यांचा हा अप्रत्यक्ष रोख आमदार संजय शिरसाट यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article