एक शिंग तुझ्या नरड्यात खुपसल्याशिवाय राहणार नाही:तोपर्यंत तुझी बडबड बंद होणार नाही, संजय गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
2 hours ago
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अर्थात वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी टीका करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी तिथे कामख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंगे पुरली असल्याने देवेंद्र फडणवीस तिथे राहायला जात नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याविषयी केलेल्या धक्कादायक दाव्यावर प्रश्न विचारला असता, संजय गायकवाड म्हणाले, नेहमी शिंग आणून पुरले. शिंग आणून पुरले, असे बोलतात. माझे राऊतांना सांगणे आहे की एक शिंग मी नक्की आणणार आणि तो तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत तुझी बडबड बंद होणार नाही, असा थेट हल्लाबोलच संजय गायकवाड यांनी केला आहे. संजय गायकवाड म्हणाले, संजय राऊत अंधश्रद्धेचे बळी असे बोलतात, हे पाहत आहे. कामाख्या देवी ही भारतातल्या अनेक भक्ताचे श्रद्धाच स्थान आहे. आम्ही गुवहाटीला गेलो, त्यावेळेला जागृत देवस्थान आहे असे सांगितले. म्हणून आम्ही सर्वांनी आणि एकनाथ शिंदे यांनीही त्या ठिकाणी दर्शन घेतले. आपल्या भारतामध्ये देवस्थान आहे, त्या देवस्थानासमोर नतमस्तक होणे हा अंधश्रद्धेचा भाग नाही, असे स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिले आहे. अपेंडीक्स त्यांच्या डोळ्यात खुपत आहे संजय गायकवाड पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे भाजपचा अपेंडीक्स असे बोलतात, हे मी पाहिले आहे. भाजपला टोचतोय, पण कापता येत नाही असे झाल्याचे म्हंटले जात आहे. अपेंडीक्स भाजपला नाही. भाजप, एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना आहे. त्यामुळे अपेंडीक्स त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांच्या उरावर टीचून जे बोलत होते की 50 पैकी एकही आमदार निवडून येणार नाही. तिकडे बघा 60 ते 61 आमदार निवडून आले आणि भाजपसोबत आहोत. हे त्यांच्या टीमला खुपत आहे. उद्धव ठाकरेंवर केली टीका उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना तुम्ही पुतळा का उभारला नाही. पाच वर्षे भाजपसोबत सत्तेत अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि पंचवीस वर्ष पालिका ताब्यात असून पुतळा का उभारला नाही. लोकांवर टीका करता येते, मात्र आपल्याला स्वतःला काम करता येत नाही, असे म्हणत संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पालकमंत्री पदावर संजय गायकवाड स्पष्टच बोलले महाराष्ट्रात रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या मतभेद सुरू आहेत. यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, तिथे शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेचाच पालकमंत्री असायला हवा. माझ्या जिल्ह्यात भाजपचे आमदार आणि एक राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र पालकमंत्री राष्ट्रवादीचा दिला. हा भाजपच्या लोकांवर अन्याय आहे. त्यामुळे रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा असायला हवा, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. टीका केली तरी आम्ही आमचे काम सुरूच ठेऊ मंत्री गणेश नाईक तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनता दरबार घेतला होता, यावर प्रश्न विचारला असता त्यावर संजय गायकवाड म्हणाले, गणेश नाईक मंत्री, एकनाथ शिंदेही मंत्री, दोघे आपल्या पक्षाचे काम आणि जनतेचे काम करतात. त्यामुळे तेंनी जनता दरबार घेतला. वेगळे कारण काही नाही. आम्ही युतीमध्येच आहोत. विरोधक कुठे शिल्लक आहेत. आम्हाला नाव ठेवायला 16 आमदार कॉंग्रेसचे आणि शिवसेनेची हालत सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे त्यांनी किती टीका केली, तरी आम्ही आमचे काम चालूच ठेऊ, असेही संजय गायकवाड म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)