कंत्राटावरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठा राडा:ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासगी सुरक्षांना बदडले

2 hours ago 1
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ घातल्याचे समोर आले आहे. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण केली आहे. कार्यकर्त्यांनी तीन सुरक्षा रक्षकांना बेदम चोप दिला. सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीच्या कंत्राटवरून हा वाद झाला असून कंत्राटाची कागदपत्रे जमा करण्यासाठी खासगी अंगरक्षक सोबत आणल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतापले होते. या घटनेदरम्यान, आमदार वैभव नाईक हे देखील तिथे उपस्थित होते. या प्रकाराव वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमच्या पक्षाचे नेते सतीश सावंत, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन होते. आंदोलन संपल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी उपस्थित होते. यादरम्यान जिल्हा परिषदेत काही लोक सरपंचांना, ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना घेऊन त्यांची तपासणी करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. याबाबत आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवले, मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असे वैभव नाईक म्हणाले. आंदोलन झाल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेत पोहोचलो तेव्हा आठ ते नऊ खासगी अंगरक्षक आणि दोन पुढारी लोकांची तपासणी करत होते. आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सीसीटीव्ही तपासल्यानंतर ते दोन पुढारी कोण होते, ते देखील स्पष्ट होईल, असेही वैभव नाईक यांनी सांगितले. सीईओंकडे केली तक्रार पुढे बोलताना वैभव नाईक म्हणाले की, सावंतवाडी पंचायत समितीचे आठ कोटींचे कंत्रात मॅनेज करण्यासाठी हे खासगी सुरक्षा रक्षक या ठिकाणी बसलेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक काम मॅनेज होत आहेत. अधिकाऱ्यांवर दमदाटी केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. अशा भ्रष्टाचारामुळे या गोष्टी घडत आहेत. अशा लोकांवर कारवाई व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी, यासाठी आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली आहे, असेही नाईक म्हणाले. हेही वाचा... राजकोट पुतळा दुर्घटनाप्रकरणी ठाकरे गटाच्या आमदाराची होणार चौकशी:वैभव नाईक यांना पोलिसांनी पाठवली नोटीस मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. राजकोट येथे पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना चौकशीबाबत नोटीस पाठवली आहे. सविस्तर बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article