काँग्रेसचा ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न:दिल्लीत तळ ठोकूनही त्यांचा कटोरा मोकळाच, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

2 hours ago 2
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचे डावपेच रचत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजप व शिवसेनेचा शिंदे गट महायुतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बाहेर काढण्याच्या बेतात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी हा आरोप केला आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यातच सत्ताधारी भाजप व शिवसेना हे दोन पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पत्रकारांनी याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा शरद पवार गटच उद्धव ठाकरे यांनाच महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार केला. उद्धव ठाकरेंचा कटोरा मोकळाच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीबाहेर काढण्याच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. काँग्रेस व उद्धव ठाकरे यांचे पेड वर्कर असा खोटा नरेटिव्ह तयार करत आहेत. याऊलट मी तर असे म्हणेन की, काँग्रेस व शरद पवार गट मिळून उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मविआतील घटकपक्षांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले. पण ते त्यांची साथ देत नाहीत. त्यांना दिल्लीत 2 दिवस ताटकळत बसवून ठेवले. स्वतः उद्धव ठाकरेही मुख्यमंत्रीपद द्या म्हणून दिल्लीत कटोरा घेऊन फिरत होते. पण दोन दिवस तळ ठोकूनही त्यांचा कटोरा मोकळाच राहिला. ठाकरे गटाचे प्रवक्ते महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची गरज असल्याचा दावा करत आहेत. पण त्यांच्याकडे दुसरे कुणीही पाहायला तयार नाही. त्यामुळे विदर्भात उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याची चर्चा रंगली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपुरातही उद्धव ठाकरे गटाला एकही जागा देण्यास कुणी तयार नाही. काँग्रेसने यापूर्वीच नागपूरच्या सर्व जागा आम्ही लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आघाडीतून बाहेर काढण्याचे काम महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. भाजप कर्जत - जामखेड जिंकणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी कर्जत - जामखेडची जागा भाजपच जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहित पवारांचे हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे तिथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात 100 टक्के आमचा विजय होईल. तिथे शरद पवार गटाचा म्हणजे रोहित पवार यांचा निश्चित पराभव होईल, असे ते म्हणाले. हे ही वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article