कुंभमेळा चेंगराचेंगरीत 1000 हून अधिक ठार:पण योगी आदित्यनाथ यांनी आकडा लपवण्यासाठी मृतदेह भट्टीत जाळले, VBA च्या आरोपाने खळबळ

2 hours ago 2
प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 1000 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात 28 जानेवारी मध्यरात्री मौनी अमावस्येला मोठी चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत 30 जणांचा बळी गेल्याचा दावा सरकारने केला आहे. पण आता या आकड्यावर संशय व्यक्त केला जात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने शनिवारी एका ट्विटद्वारे या चेंगराचेंगरीत 30 नव्हे तर 1 हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला. 'प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 1000 हून अधिक भाविक मृत्युमुखी पडले. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खरा आकडा लपवण्यासाठी हिंदू रीतीरिवाज पायदळी तुडवत मृत भाविकांचे मृतदेह भट्टीत जाळले,' असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. इतरही दोन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचा दावा दुसरीकडे, प्रयागराजमध्ये एक नव्हे तर 2-3 ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप केला जात आहे. पण सरकारने अद्याप त्याची पुष्टी केली नाही. बीबीसीने आपल्या एका वृत्तात मौनी अमावस्येच्या दिवशी आणखी 2 ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला आहे. या वृत्तानुसार, मौनी अमावस्येच्या दिवशी समुद्रकुप चौकापासून (उलटा किला चौक) एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐरावत रस्त्यावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. बीबीसी हिंदीने याचे अनेक व्हिडिओ पाहिलेत. त्यात किमान 4 मृतदेह दिसून येत आहेत. या ठिकाणी अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी करत आहेत. कुंभ सेक्टर -21 मध्ये समुद्रकूप मार्गालगत चेंगराचेंगरी झाल्याचा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केल्याचा दावा बीबीसीने केला आहे. हा परिसर प्रयागराजच्या झुंसी परिसराला चिकटून आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्या दिवशी तिथे इतकी गर्दी होती की, भाविकांना जागेवरुन हलताही येत नव्हते. भाविक एकाच ठिकाणी अडकून पडले होते. त्यांना पुढे किंवा मागेही जाता येत नव्हते. सुप्रीम कोर्टाचा सुनावणी करण्यास नकार दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने महाकुंभातील भाविकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिलेत. वकील विशाल तिवारी यांनी कुंभमेळ्यातील ही याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी यामध्ये देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची आणि नियमांचे पालन करण्याची मागणी करण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article