दिल्लीचा निकाल पाहून 'रडत राऊत' कोमातच गेले असतील:वाचाळवीरांची भविष्यवाणी खोटी ठरली, चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर सडकून टीका
2 hours ago
1
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत राऊत हे तर कोमातच गेले असतील, अशी बोचरी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंतच्या आलेल्या कलानुसार भाजपला 48 जागांवर स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. तर आम आदमी पार्टीला केवळ 22 जागा मिळाल्या. दिल्लीतील विजयानंतर महाराष्ट्र भाजपकडून जल्लोष साजरा केला जात आहे. तर अनेक नेते विरोधकांवर निशाणा साधत आहेत. चित्रा वाघ यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत यांचा समाचार घेतला. काय म्हणाल्या चित्रा वाघ?
आज महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाभकास आघाडी आहे हे सिद्ध झाले आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत राऊत हे तर कोमातच गेले असतील..त्यांनी नेहमीप्रमाणे खोटी भविष्य वाणी केली होती... खरंतर त्याला स्वप्न रंजन म्हटले तर योग्य ठरेल, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. दिल्लीची निवडणूक जिंकणे ही मोदीजींची शेवटची इच्छा आहे, असे हे वाचाळवीर गांजा फुंकून बरळले होते. आजचा निकाल पाहून दिल्लीतील आकाच्या गळ्यात गळे घालून 'रडत राऊत' धाय मोकलून रडतील हे नक्की, असा टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला. अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला - CM फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. दिल्ली विधानसभेवर 27 वर्षांनंतर भाजपचा झेंडा रोवला गेला. याचा मला अतिशय आनंद आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे व जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. या विजयामुळे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. त्यांनी सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांची दिशाभूल करत ज्या प्रकारे राज्य केले, त्या परंपरेचा आज अंत झाला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. दिल्लीतील यशामागे अमित शहांचे कष्ट - अजित पवार
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या 40 हून अधिक जागा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्र्यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल, असे अजित पवार म्हणाले. दिल्लीतील भाजपच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली, असेही त्यांनी म्हटले. अजित पवारांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
दुसरीकडे, दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. दिल्लीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 30 उमेदवार उभे केले होते. या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पक्षाला या निवडणुकीत केवळ 0.03 टक्के मते मिळाली आहेत. जुलै 2023 मध्ये अजित पवार आणि शरद पवार गटात राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर दिल्लीतील ही पक्षाची पहिलीच निवडणूक होती. मात्र, या निवडणुकीतही त्यांना फारसे यश आले नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)