खा. बळवंत वानखडे यांचे प्रतिपादन:"स्नेहसंमेलनामधून विद्यार्थ्यांना मिळतेय हक्काचे व्यासपीठ'
2 hours ago
1
विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी स्नेहसंमेलन अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खा. बळवंत वानखडे यांनी केले. शहरातील साईनगर स्थित सुभाषचंद्र बोस ज्ञान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळद्वारा संचालित संत तुकाराम इंग्लिश प्रायमरी स्कूल व स्टार एज्युकेशन सोसायटी दर्यापूरद्वारा संचालित गोल्डन किड्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने नुकतेच स्नेहसंमेलन उमंग २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद््घाटक म्हणून मार्गदर्शन करताना खा. वानखडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक अनिल जळमकर तर अरुण भागवत, डॉ. अभिषेक भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष केशव जळमकर, सचिव सौरभ जळमकर, सुरेंद्र लोखंडे, अरुण राजगुरे, गौरव जळमकर, दत्ताभाऊ जळमकर तसेच गोल्डन किड्स शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा घुणारे, बाबुराव जळमकर, वामनराव जळमकर, विनायक जळमकर यांची उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर खा. वानखडे यांनी विद्यार्थी जीवनात स्नेहसंमेलनाचे असलेले महत्त्व विषद करत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाची कशी जडणघडण होते यावर प्रकाश टाकला. स्नेहसंमेलनादरम्यान ग्रँड पेरेंट्स डे तसेच रांगोळी, हस्तकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, सायन्स एक्झिबिशन, एसएसटी एक्झिबिशन, डिश डेकोरेशन आदी कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून वाव मिळाला. विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आले. प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका जयश्री चौखंडे यांनी शाळेचा संपूर्ण वृत्तांत थोडक्यात विशद केला. या कार्यक्रमांचे संयुक्तरीत्या सूत्रसंचालन शिक्षिका कल्याणी कुलट व प्रियंका इचे यांनी केले. आभार शिक्षिका रुपाली जयसिंगपुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संदीप काळे, शुभम जळमकर तसेच दोन्ही शाळेतील शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या उद््घाटन सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना खा. वानखडे व मंचावर उपस्थित अन्य. मोबाइलपासून दूर राहण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन संस्थेचे सभासद सुरेंद्र लोखंडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे तसेच कोणत्या गोष्टीतून आपला व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी एकत्र कुटुंब पद्धती तसेच मोबाइलच्या व्यसनापासून आपण स्वतःला कसे दूर ठेवावे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)