जागावाटपाचा निर्णय दोन-चार दिवसांतच शक्य:मविआच्या बैठकीआधीच खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

1 hour ago 1
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या तीन-चार दिवसांत परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत बैठकांची फेरी सुरू झाली असून घटक पक्षांचीही आजही बैठक सुरु असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या संदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जयंत पाटील यांनी कालच स्पष्ट केले आहे की, जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. आम्ही यासंदर्भात नियमित बैठकाही घेत आहोत, आजही बैठक होत आहे. येत्या 3-4 दिवसांत याबाबत परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.' पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा पवारांचा निशाणा दुसरीकडे, शरद पवार यांनी रविवारी सांगितले होते की, महाविकास आघाडी येत्या 8-10 दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात जागावाटपाची चर्चा पूर्ण करेल. पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधत शरद पवार म्हणाले होते की, त्यांच्यापैकी काहींना निवडणूक जिंकता येणार नाही. कार्यकर्त्यांकडून मत मागवले जात आहे - शरद पवार शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात कोणाला तिकीट दिले जाणार हे देखील सांगितले होते. त्या जोरावर ज्या नेत्यांच्या विजयाची शक्यता आहे, त्यांना तिकीट मिळेल, असे शरद पवार म्हणाले होते. शरद पवार म्हणाले की, तुम्ही सर्व जागांवर निवडणूक लढवू शकत नाही आणि तुम्हाला इतर साथीदारांना उमेदवार उभे करू द्यावे लागतील आणि त्यांच्यासाठीही काम करावे लागेल. आम्हाला आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत बनवायचे आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे घटक पक्ष खऱ्या दावेदारांवर कार्यकर्त्यांची मते घेत आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर सर्वेक्षण करण्यात आले आहे. राजकीय पक्षांचे नेते स्वतःचे निर्णय घेऊ शकतात, पण कार्यकर्ते हे थेट जनतेशी जोडलेले असतात, असेही पवार म्हणाले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांचे मंत्रालयालयासमोर आंदोलन:धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षणास विरोध सरकारमध्ये असूनही आमचे ऐकले जात नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्याला विरोध करत झिरवळ यांनी मंत्रालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला समाजाने सभागृह पाठवले आहे. त्यामुळे आम्ही समाजासाठी भांडणार असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. मात्र राजीनामा देणे हा पर्याय नाही. आम्हाला समाजाने समाजासाठी भांडण्याला सभागृहात पाठवला आहे. आम्ही देखील समाजासाठी भांडण करायला तयार असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा.... धारावीच्या मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात:या आधी मनपाला झाला होता मोठा विरोध धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास ट्रस्टने सुरुवात केली आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला होता. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकतेच ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण बातमी वाचा... पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला:गणेवशाचे धक्कादायक चित्र; विरोधी पक्षाचा राज्य सरकारवर निशाणा राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहेत. सरकारी शाळे मधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचे दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केली आहे. या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा... भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव:परिवर्तनाची चाहूल असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे गटाचा BJP वर जोरदार हल्ला तरुणांचा आवाज म्हणून विद्यापीठांच्या ‘सिनेट’कडे पाहिले जाते. फी, परीक्षा, अभ्यासक्रम यावर तेथे चर्चा घडतात व निर्णय होतात. पदवीधरांचा आवाज हा लाखो तरुणांचा आवाज आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत हे धोरण पराभवाच्या भयातून आले होते. मात्र मुंबई विद्यापीठात पदवीधरांनी भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव केला. ही परिवर्तनाची चाहूल असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article