डावा कालवा दुरुस्तीला 400 कोटींचा डीपीआर:पहिला टप्पा पैठण ते जालन्यापर्यंत 104 किमीची कामे होणार
3 hours ago
1
जायकवाडी धरणाची निर्मिती मराठवाड्यातील सिंचन लक्षात घेऊन करण्यात आली. धरणावर डावा आणि उजवा कालवा तयार करण्यात आला. मात्र, आता या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था झाली आहे. वहनक्षमता निम्म्यावर आली आहे. २०८ किमी लांबीच्या डाव्या कालव्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी ७३५ कोटींचा डीपीआर प्रशासकीय पातळीवर दुसऱ्या टप्प्यात आहे. पैठण ते जालना पर्यंतच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोटींचा डीपीआर सादर करण्यात आला आहे. तो पहिल्या टप्प्यात आल्यानंतर जालनापर्यंतची सर्व कामे करण्यात येणार आहेत. आम्ही ४६ वितरिकांचे काम सामाजिक संस्थांकडून करून घेतले असल्याने कालव्याची वहनक्षमता कमी होणार नाही याची काळजी घेतली असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील पावणेदोन लाख हेक्टर शेती ओलिताखाली येते. तरीही, जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. पहिल्या टप्प्यातील जालनापर्यंत कालवा दुरुस्तीसाठी ४०० कोटी निधी मार्चपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील शेती पाण्याखाली येते. दरवर्षी धरणाचा पाणीसाठा ३३ टक्क्यांपुढे असेल तर पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र, धरण शंभर टक्के भरले आणि त्यात शेतीला आठ ते नऊ पाणी पाळी दिल्या जातात. आता ही पाणी पाळी देण्यात येत आहे. दोन्ही कालवे पूर्ण खराब जायकवाडीवर डावा व उजवा हे दोन कालवे असून दोन्हींची अवस्था बिकट झाली आहे. या कालव्यासंदर्भात दिव्य मराठीने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही प्रमाणात कालव्याची दुरुस्ती करण्यात आली व ती दरवर्षी करण्यात येते. यावर एक ते दोन कोटींच्या वर खर्च होतो तरी वहनक्षमता मात्र वाढताना दिसत नाही. निधीची मागणी करणार ^जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी आम्ही करणार आहोत. पाटबंधारे विभागाने ७३५ कोटी डीपीआर सादर केला आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी लवकरच कसा निधी उपलब्ध होईल यासाठी सबंधित विभागाच्या अधिकारी, मंत्री यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करुन देऊ. -विलास भुमरे, आमदार, पैठण २० किमीचा आहे कालवा डावा कालवा हा २०८ किमी लांबीचा असून त्याची वहनक्षमता १००.०८ घ.मी प्रति सेकंद आहे. या कालव्यावर संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील १४१६४० हेक्टर जमीन ओलिताखाली येते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)