तरुणाच्या हत्येप्रकरणी नातेवाईकांसह नागरिकांची पोलिस ठाण्यावर धडक:कोतवाली ठाण्यासमोर ठिय्या, लोकप्रतिनिधीही पोहोचले

1 day ago 1
शहरात खुनाच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नसून, मागील १० दिवसांपासून शहरात कुठे ना कुठे खुन होत आहेत.मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील चित्रा चौकात आणखी एक खुनाची घटना घडली. १०० रुपये मागितल्यानंतर केवळ २० रुपयेच दिल्याने उद्भवलेल्या वादात दोघांनी एका तरुणाची चाकू व लोखंडी हुकने हल्ला चढवून निघृर्ण हत्या केली. गत १० दिवसांतील शहरातील खुनाची ही पाचवी घटना आहे.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. निशांत उर्फ गोलू सुनील उसरेटे (३१) रा. रतनगंज असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी गोपाल अंकुशराव चव्हाण (४१) रा. रतनगंज यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी बुधवारी, १६ ऑक्टोबर रोजी मारेकरी विक्की गुप्ता (३५) रा. रतनगंज व योगेश गरुड (३०) रा. विलासनगर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मंगळवारी रात्री गोपाल, निशांत व समीर हे तिघे त्यांच्या अपघातग्रस्त मित्रांना बघण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले होते. तेथून घरी परतत असताना निशांत गोपालची दुचाकी चालवत होता. चित्रा चौकात पोहोचल्यावर दुचाकीवर असलेल्या त्यांच्याच परिसरातील रहिवासी विक्की व त्याचा सहकारी योगेशने निशांतला रोखले. विक्कीने गोलूला १०० रुपये मागितले. त्यावर त्याने केवळ २० रुपये दिले. २० रुपयेच दिल्याने योगेशने गोलूला चाकूने मारण्याची धमकी दिली. त्यावर ये हमारे मोहल्ले की बात है, तू क्यू बोल रहा है, असे निशांतने त्याला म्हटले. त्यानंतर निशांत हा विक्कीशी बोलत असतानाच विक्कीने निशांतवर लोखंडी हुकने उर्वरित. पान ४ निशांत उसरेटे हा २००७ पासून जयभोले कावड यात्रा काढत होता.सर्वात मोठी कावड यात्रा म्हणून ती नावारूपास आली होती. भाविक असलेल्या गोलूच्या हत्येनंतर बुधवारी, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी नातेवाइकांसह शेकडो नागरिकांच्या जमावाने कोतवाली ठाण्यावर धडक दिली. जमावाने रस्त्यावरच ठिय्या दिला. त्यामुळे हा रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आरोपींना अटक करून आमच्या समोर आणा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्यावर पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, साहाय्यक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर, कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काही लोकप्रतिनिधींनीही त्यांची समजूत काढली. दरम्यान, दोन्ही मारेकऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती संतप्त जमावाला देण्यात आली. त्यामुळे जमाव शांत झाला.त्यानंतर मृतकाचे शवविच्छेदन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article