नवीन सुसंस्कृत राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला संधी द्या:संभाजीराजे, शरद पवारांसह सर्वच प्रमुख पक्षांवर साधला निशाणा

2 hours ago 1
महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांशी गद्दारी करणाऱ्या, विचारांना तिलांजली देणाऱ्या प्रस्थापित राज्यकर्त्यांना बाजूला करा व नवीन सुसंस्कृत राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला संधी द्या, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्यभरातून आलेल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली, यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मिळालेल्या ' सप्तकिरणांसह पेनाची नीब ' या निवडणूक चिन्हाचे अनावरण देखील संभाजीराजे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलत असताना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्षांवर टीका करत, या सर्व प्रमुख प्रस्थापित पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली असून या सर्व राजकीय पक्षांना बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले. स्वराज्य पक्षामुळे इतर राजकीय पक्षांना भरली धडकी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव बोलताना म्हटले की, स्वराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय पक्षांना याची धडकी भरलेली आहे त्यामुळे स्वराज्य पक्षाने लावलेले बॅनर प्रशासन व पोलिसांच्या मदतीने सरकार काढत आहे. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, माधव देवसरकर, आप्पासाहेब कुढेकर, रघुनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, केशव गोसावी, महादेव तळेकर, महेश गवळी, ज्ञानेश्वर थोरात, उमेश शिंदे, रुपेश नाठे, विनोद परांडे, गणेश सोनवणे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवार यांना संभाजीराजे यांचे चोख प्रत्युत्तर शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष तसेच परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना परिवर्तन महाशक्ती मधील पक्षांवर उपहासात्मक टिका केली होती. या टिकेला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार सांगून पवारांना उत्तर दिले, ते म्हणाले की, ' ते प्रथम तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर हसतील, त्या नंतर तुमच्याशी लढतील आणि शेवटी तुम्ही जिंकताल 'या वाक्यानंतर सभागृहातील सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article