Published on
:
23 Sep 2024, 3:17 pm
Updated on
:
23 Sep 2024, 3:17 pm
हाणेगाव पुढारी वृत्तसेवा: देगलुर तालुक्यातील हाणेगाव येथील विजेच्या धक्याने पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.23) सायंकाळी पाच वाजता घडली. अक्षरा परशुराम नाईकवाडे असे मृत मुलीचे नाव आहे. देगलुर तालुक्यातील हाणेगाव हाणुमान नगर (बेघर) येथील हनुमान मंदिराला कंपाउंडला संरक्षण राहावे म्हणून लोखंडाची जाळी केली होती . मंदिराला लाईट राहवे या उद्देशाने खांबावरून विद्युत तार घेतलेल्या लोखंडे जाळी जवळ कट झाल्याचे गल्लीतील नागरिकांना कोणालाही माहीत नसल्यामुळे सायंकाळी अंदाजे पाचच्या सुमारास अक्षरा परशुराम नाईकवाड हिने घरच्या बाजूला हातपंप येथून घागर प भरून पाणी घेऊन जात असताना तिचा कंपाऊंड संरक्षण केलेल्या जाळीला हात लागला. यामुळे ती तिला विजेच्या जोरदार धक्का बसला.
यानंतर शेजारच्या लोकांनी बघून मदतीसाठी आरडा ओरड केली. परंतु तिला वाचविण्यासाठी तातडीने हाणेगवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.या घटनेची माहिती मिळताच मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंनद बंडे , जमादार पाटील यांच्या पथकाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जाऊन चौकशी केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत मरखेल पोलीस ठाण्यात नोंद सुरू आहे.अक्षरा परशुराम नाईकवाडे ही इयत्ता आठवी वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात अतिशय हुशार असलेली शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होती. तिच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. तिच्या पश्चात आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.