पंकजांच्या मेळाव्याला जाऊन पुत्राने राखली ओबीसींची मर्जी:जरांगेंना भेटून रोष कमी करण्याचा वडिलांचा प्रयत्न

2 hours ago 1
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा देण्याचा निर्णय सरकारने न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी ठराविक उमेदवार पाडण्याबाबत वक्तव्य केले. याचाच धसका सत्ताधारी व विरोधक घेत आहेत. त्याचमुळे आंतरवाली सराटीत दिग्गज नेत्यांची रिघ लागली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्री २ वाजता जरांगे यांची भेट घेतली. सरकारच्या वतीने ते गेल्याचे सांगितले जाते. परंतु, पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर डॉ.सुजय विखे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर मराठा समाजात तीव्र रोष व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीत हा रोष परवडणारा नसल्याने मंत्री विखेंकडून ही भेट घेतल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. लोकसभेतून धडा घेऊन आता प्रत्येक पक्ष व नेता सावध पावले टाकताना दिसतो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा मुद्दा सोडवला गेला नसल्याने मनोज जरांगे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. उमेदवार उभे करायचे की पाडायचे यावर मराठा समाजाची आंतरवाली सराटीत गुरुवारी एक बैठक झाली. २० ऑक्टोबरला दुसरी बैठक होणार आहे. यावेळी निर्णायक भूमिका ठरवली जाणार आहे. पण लोकसभेपेक्षा विधानसभेत मराठा समजाची अधिक ताकद दिसणार असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांना आहे. लोकसभेमध्ये बीड मतदारसंघात जे चित्र दिसले त्याची पुनरावृत्ती आपल्या मतदारसंघात दिसू नये, अशी धास्ती दिग्गजांना लागली. त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटून नेत्यांकडून आपापली भूमिका सांगितली जात आहे. मराठा समाज दुखावू नये म्हणून घेताहेत काळजी मराठवाड्यात बहुतांश मराठा समाजाला आरक्षण नाही. अहिल्यानगरची स्थिती वेगळी आहे. येथील बहुतांशी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण आहे. पण समाज म्हणून एकसंघ असावे व समाजाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहायला हवे, अशी भावना समाज बांधवांमध्ये उमटताना दिसते. त्यामुळे जरांगे पाटील म्हणतील त्या उमेदवाराच्या मागे समाज उभा राहू शकतो, अशी भीती असल्याने नाराजी टाळण्याच्या दृष्टीने भेटीगाठीचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जाते. विधानसभेत ऐनवेळी फटका बसण्याची भीती लोकसभेतील पराभवानंतर डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती. या दोन्ही ठिकाणी ते चाचपणी करत आहेत. त्यांचे वडिल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहता मतदारसंघात अनेक टर्म प्रतिनिधित्व करत आहेत. पण सुजय यांच्या दसरा मेळाव्यातील हजेरीनंतर सोशल मीडियावर मराठा समाज आक्रमक असताना ऐनवेळी राहता तसेच संगमनेर किंवा राहुरीतून सुजय उमेदवार राहिले तर काही फटका बसू शकतो, अशी भीती मंत्री विखेंना वाटत आहे. त्यामुळे हा रोष कमी करण्याची गरज आता उद्भवल्याचे बोलले जाते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article