परतीचा पाऊस, ढगाळ वातावरणाचा कांद्याला फटका; शेतकरी अडचणीत:शेतातील कांदा पिकावर करपा व मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

1 day ago 2
तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सतत ढगाळ हवामान होते. तसेच परतीच्या पावसानेही जोरदार हजेरी लावली. याच दरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा व उन्हाळ कांद्याची महागडी बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती, पण परतीच्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची ही कांदा रोपे उद्ध्वस्त झाली आहेत. कांदाउत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. लागवड केलेल्या कांदा पिकावर मावा व करपा रोगाने प्रचंड आक्रमण केल्याने हे पीक शेतातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कांदाउत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. लागवडीला आलेली लाल कांदा रोपे व कांदा पिके खराब झाली आहेत. दुसरीकडे उन्हाळा लाल कांद्याची रोपे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी दुकानांमध्येही बियाण्यांचा तुटवडा दिसत आहे. त्यामुळे शेतकरी उन्हाळ कांद्याची रोपे कशी तयार करावी, या संकटात शेतकरी सापडला आहे. यंदा गुलाबी कांद्याचे रोप व कांदालागवड केली होती. कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षांनी कांदालागवड केली होती, परंतु यंदा ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले. लाल कांदा व उन्हाळी कांदा बियाणे खरेदी करून शेतात टाकले होते, परंतु ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाने जागेवर उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत असल्याचे प्रगतशील शेतकरी बाळू चव्हाण व मारुती भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article