पावसाच्या पाण्याने उदगावात बायपास महामार्ग बंद, जयसिंगपुरात वाहतूक कोंडी

2 hours ago 2

उदगाव व जयसिंगपूरमध्ये अशा प्रकारे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.file photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

23 Sep 2024, 8:48 am

Updated on

23 Sep 2024, 8:48 am

जयसिंगपूर : मुसळधार पावसामुळे रविवारी मध्यरात्री कोल्हापूर-सांगली बायपास महामार्गावरील उदगाव येथे ओढ्यावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे. सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने, जयसिंगपूर-उदगाव मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

शिरोळ तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत उसंत घेतलेल्या पावसाने सायंकाळ नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे जयसिंगपूर शहरातून उदगाव येथील कृष्णा नदीला जोडणाऱ्या मुख्य ओढ्याला पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने रविवारी मध्यरात्री सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव टोल नाक्यावर बॅरिकेट लावून वाहतुकीचे नियोजन केले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास वाहत्या पाण्यातूनच मोठी वाहने जात होती. मात्र छोटी वाहने व दुचाकी जात नसल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. जयसिंगपूर-उदगाव मार्गे वाहतूक सुरू असल्याने सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्ग ठप्प झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article