पुण्यात 7 महिन्यांत 265 बलात्कार तर 750 विनयभंगाच्या घटना:शिंदे-फडणवीस सत्तेत असे पर्यंत महिला सुरक्षित नाहीत, सुषमा अंधारेंची टीका

1 hour ago 1
पुणे शहरात मागच्या सात महिन्यात 265 बलात्काराच्या आणि 750 विनयभंगाच्या घटना आहेत. जो पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. तो पर्यंत राज्यातील महिला सुरक्षित राहणार नसल्याची टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. ठाकरे गटाच्या वतीने महाड विधानसभा रहिवासी मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. याप्रसंगी माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर, शहर संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, रघुनाथ कुचीक, स्नेहल जगताप आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या, या राज्यातील मुली शाळेत, बसमध्ये तर हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, नर्स सुरक्षित नाही. याबद्दल पोलिसांना काय बोलवे. ते स्वत: सुरक्षित नाहीत. तर दुसरीकडे रिक्षा चालक ते मुख्यमंत्री पदाच्या प्रवासात एकनाथ शिंदे यांना कधीही बहीण आठवली नाही. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत बहिणींनी दाखविलेल्या हिसक्यामुळे त्यांना लाडकी बहिण सारखी योजना आणावी लागली. बहिणीला मदत केल्यावर आपण त्याची बॅनरबाजी, जाहिरात करतो का? असा प्रश्न उपस्थित करत त्या म्हणाल्या की, हे भाऊ बहिणींच्या मतावर टपले आहेत. महायुतीचे सरकार महिलांकडे केवळ मतदार म्हणून पाहत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ...यासाठी घेतला अक्षय शिंदे बळी सरकारच्या हलगर्जीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडला. याप्रकरणातील आरोपी जयंत आपटेला जेवढ्या उशिरा अटक झाली तेवढ्या लवकर त्याला जामीन मिळाला आहे. जयंत आपटेला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला असल्याचा आरोप सुद्धा अंधारे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरेंना दिमाखात वर्षा बंगल्यात स्थानपन्न करायचे आहे ज्या लोकांनी गद्दारी, कटकारस्थान करुन उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्याच्या पायर्‍या उतरायला भाग पाडले. त्याच बंगल्यात उद्धव ठाकरे यांना दिमाखात स्थानापन्न करायचे आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा जिंकावी लागणार आहे. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे सुत्र माहाविकास आघाडीत ठरले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे असल्याने प्रत्येक जागा जिंकावी लागणार आहे. यामुळेच पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर आणि कोथरुड मतदार संघाची मागणी केली असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. गुप्त बैठक घ्याव्यात... मतदारसंघात मतदार यादी नुसार बैठका घेण्यात याव्यात. यातील प्रभावी मतदारांची वेगळी नावे काढून त्यांच्यासोबत गुप्त बैठका घ्याव्यात. या बैठकीतील एकही गोष्ट बाहेर जणार नाही, यांची काळजी घ्यावी, असेही अंधारे यांनी यावेळी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article