बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण:जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांचे प्रतिपादन

5 days ago 4
बचत गटाच्या महिला आता पापड लोणचे यांच्यासह घटना व्यवसायाची चौकट मोडून मोठ्या उद्योग क्षेत्रात उतरल्या आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय करण्याचे बळ त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महिला महासमृद्धी सक्षमीकरण अभियानातून मिळाले आहे. बचत गटामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होत आहेतच, त्याच बरोबरीने या महिलांच्या माध्यमातून शेतीसह इतर उद्योगालाही पाठबळ मिळत आहे. स्वयंसहायता बचत गट ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम आहे,असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले. तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री. बालंबिका माता स्वयंसहायता महिला बचत गटाच्या दहा महिलांनी एकत्र येत विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या जेसीबी मशिनरीचे पूजन शनिवारी श्री. बालंबिका देवी मंदिरासमोर घुले, साध्वी शितल महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घुले बोलत होत्या. घुले म्हणाल्या, स्त्री शक्ती संघटित झाली तर काय होऊ शकते याचे जीवंत उदाहरण म्हणजे बालमटाकळी येथील श्री. बालंबिका माता महिला स्वयंसहायता बचत गटाच्या या दहा महिला आहेत. या महिला बचत गटाचा धाडसी निर्णय कौतकस्पद आहे. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच डॉ. राम बामदळे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, हरिश्चंद्र घाडगे, मधुकर पाटेकर उपस्थित होते. बचत गटाने खरेदी केलेल्या जेसीबीचे राजश्री घुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article