महायुतीचे सरकार आणल्यास वीजबील भरण्याची गरज नाही:मोहोळ येथील सभेत अजित पवारांचा शेतकऱ्यांना वादा

2 hours ago 2
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील 15 दिवसांत शेतकऱ्यांचे वीजबिल शून्य होणार आहे. अशी घोषणा अजित पवार यांनी सोलापूरच्या मोहोळ येथे एका सभेत केली. तुम्ही महायुतीचे सरकार आणल्यास पुढील पाच वर्ष बिल द्यावे लागणार नाही, हा दादाचा वादा आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. अजित पवार सध्या जनसन्मान यात्रा करत असून रविवारी ही यात्रा सोलापूरमध्ये आली होती. यावेळी मोहोळ येथे एका सभेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा करत विरोधकांवरही टीका केली आहे. ...तर लोक तोंडात शेण घालतील अजित पवार म्हणाले की, 2004 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मी नवीन होतो. त्यावेळच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे विजबील माफ करायचे, असे म्हटले होते. शेतकऱ्यांची मते घेऊन आम्ही सत्तेवर आलो, त्यानंतर काँग्रेसने विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले. लोकांनी विजबील माफीच्या नावाने आपल्याला मते दिली, तेव्हा लोक तोंडात शेण घालतील, असे मी म्हणालो होतो. मात्र तो निर्णय सुशीलकुमार शिंदे यांचा होता, असे विलासराव म्हणाले होते. शेतकऱ्यांचे दु:ख समजू शकतो पुढे बोलताना पवार म्हणाले ही, शेतकऱ्यांचे वीजबील माफ करायचे हा चुनावी जुमला नाही. आउटडेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत. मी मुंबईला राहत असलो तरी माझी शेती, पोल्ट्री आणि डेअरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख मी समजू शकतो. शेतकऱ्यांनी आता मागचे किंवा पुढचे बील द्यायचे नाही. पुढील 15 दिवसांत सर्व बील शून्य होणार आहे. महायुतीचे सरकार आणल्यास पुढील पाच वर्ष बिल द्यावे लागणार नाही, हा दादाचा वादा आहे, असेही पवार म्हणाले. विरोधकांचा घेतला समाचार मोठ्यांच्या पोटी आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार, असे म्हणत पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या उर्वरीत माय माऊलींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील, हा अजित दादाचा वादा आहे. तुम्ही नेहमीच स्वत:च्या आवडीला मुरड घातली. आता आलेले पैसे स्वत:साठी खर्च करा. इथून पुढे महाराष्ट्र सरकार माय माऊलींसाठी 46 हजार कोटी रूपये खर्च करणार आहे. यातून अर्थचक्र वाढणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article