महाविकास आघाडीत गृहकलह सुरू असल्याचा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. आघाडीत जागा वाटपावर एकमत होत असले तरी मुंबईतील आणि राज्यातील काही जागांवर या तीनही घटक पक्षात अजून एकमत झालेले नाही. नेमका हाच धागा पकडून आघाडीत जागांवरून एकमत का नाही? कशावरून आडले घोडे याचा गौप्यस्फोट वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकरांचा दावा काय?
शरद पवार यांनी ठरवलं आहे की 88 जागेच्या खाली जागा घेणार नाही. काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आता 244 जागांवर दावा होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाट्यात अवघ्या 44 जागा सुटतं आहेत. त्यामुळे या फॉर्म्युल्यावर मोठा पेचप्रसंग होईल आणि राजकारण होईल, असा दावा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा
उद्धव ठाकरे यांच्यासमोर कसला पेच?
यात सर्वात मोठा पेच उद्धव ठाकरे समोर असेल, असा आंबेडकरांनी दावा केला आहे. एकत्रित सेनेत असताना जितक्या जागा मिळाल्या, तितक्या जागा त्यांना मिळतील का? याविषयी आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यामागे एक कारण त्यांनी समोर केले आहे. त्यानुसार लोकसा निकालानंतर राज्यात एक सर्व्हे करण्यात आला. त्यात शिवसेनेचे 5.3 मतदानापैकी 2.7 टक्के मतदान एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकसभेनंतर वळले असे काँग्रेसमधील लोकांचे मत आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. त्यामुळे जागा वाटपात ठाकरे गटाला झुकत माप न मिळण्याचे हे एक कारण असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.