रवी राणा यांचा पाना सर्व नटबोल्ट कसणार:माजी खासदार नवनीत राणा यांचा विरोधकांना टोला, महायुतीकडे मागितल्या 4 जागा

2 hours ago 1
माजी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा विरोधकांच्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला. रवी राणा यांचा पाना सर्व विरोधकांचे नटबोल्ट कसण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बडनेरा येथून ते पुन्हा एकदा विधानसभेवर पोहोचतील, असे त्यांनी म्हटले आहे. रवी व नवनीत राणा यांनी शुक्रवारी यांनी अंबादेवी मंदिरात अनवाणी पायी जात दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत नवनीत राणा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, मी राज्यभरात भाजपचा प्रचार करणार आहे. मी भविष्यात लोकसभा किंवा राज्यसभेत प्रतिनिधित्व करावे अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. यावरून विरोधकांनी आकांडतांडव करण्याची गरज नाही. पण जिल्ह्यातील बहुतांश जागा कमळ चिन्हावर लढल्या जाव्यात यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याबाहेर राहणाऱ्यांना जिल्ह्यातील स्थितीची जाणीव नाही. ते उगीचच टीका करत आहेत. पण आता रवी राणा यांचा पाना (स्वाभिमान पक्षाचे निवडणूक चिन्ह) सर्व विरोधकांचे नटबोल्ट कसणार आहे. ते बडनेरा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सलग चौथ्यांदा निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे. महायुतीकडे 4 जागांची मागणी आमदार रवी राणा यांनी यावेळी आपण महायुतीकडे 4 जागांची मागणी केल्याचे सांगितले. ते म्हणाले, नवनीत राणा या भाजपच्‍या नेत्‍या आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्‍ह्यातील बहुतांश जागांवर कमळ चिन्‍ह असावे अशी इच्छा व्यक्त केली. पण आम्ही बडनेरा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या चार जागा महायुतीकडे मागितल्‍या आहेत. युवा स्‍वाभिमान पक्षाने या जागा लढण्‍याची तयारी केली आहे. नवनीत राणा या संपूर्ण जिल्‍ह्यात भाजपच्‍या प्रचारासाठी फिरत आहेत. त्‍या विधानसभेच्‍या मैदानात उतरणार नाहीत. त्‍या फक्‍त भाजपचा प्रचार करतील. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी त्‍यांना राज्यसभेचा शब्द दिला आहे. राज्यसभा हेच त्यांच्यासाठी योग्य सभागृह आहे, असे रवी राणा म्हणाले. हे ही वाचा... भाजपने राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढले:पण आता त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केले, हे पटतंय का? संभाजीराजेंची चौफेर फटकेबाजी ​​​​​​पुणे - भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे घोटाळे बाहेर काढले. पण त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केले, हे तुम्हाला पटतंय का? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी अगोदर व एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नंतर गद्दारी केल्याचाही दावा केला. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article