वडेट्टीवारांचे महासंचालक अन् मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र:गृह विभागावर टीका, सिद्दिकींच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

5 days ago 1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली असताना देखील त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांना दिलेली वाय दर्जाची सुरक्षा यंत्रणा, इंटीलिजन्स यंत्रणा कुचकामी ठरली. बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देखील लिहिले आहे. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच धमकी आली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली गेली. तरी देखील बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी सुरक्षा यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गृह विभागाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सरकार कायदा सुवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे, असे खेदाने वारंवार म्हणावे लागत आहे. यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृह विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र डागले आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी पत्रात केली आहे. आरोपींना सुपारी, पिस्तूल कोणी दिले वडेट्टीवार म्हणाले, बाबा सिद्दिकी यांचे मारेकरी अवघ्या 19-20 वर्षाचे आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपींना पिस्तूल कोणी दिले, कोणी मारण्याची सुपारी दिली? कोणत्या गॅंगशी आरोपींचे संबंध आहेत याचा तपास झाला पाहिजे. काही दिवसापूर्वी मुंबईत अभिनेत्याच्या घरावर गोळीबार झाला होता. त्याच भागात ही घटना घडली आहे. या दोन्ही घटनांशी संबंध असणारी टोळी एकच आहे का, याचा देखील तपास केला पाहिजे, असेही पत्रात म्हटले आहे. गृह विभाग सर्व आघाड्यावर अपयशी बाबा सिद्दिकी यांना दिलेली वाय दर्जाची सुरक्षा यंत्रणा, इंटीलिजन्स यंत्रणा कुचकामी ठरली. गृह विभाग कायदा सुवस्था राखण्यात सर्व आघाड्यावर अपयशी ठरला आहे. खरे तर मुंबई पोलीस दलाचा लौकिक जगभरात आहे. स्कॉटलंड यार्ड पोलीस दलाच्या बरोबरीने आपला लौकिक आहे. असे असताना मुंबईत हत्या होत आहेत. हे मुंबई पोलिस दलाला शोभा देणार नाही. यापुढे आपल्या राज्याच्या लौकिकाला साजेस काम आपण कराव, अशी अपेक्षाही विजय वडेट्टीवार यांनी पत्रात व्यक्त केली आहे. अशा हत्या होणे मुंबई पोलिसांसाठी भूषणावह नाही राज्यात आता कायदा सुव्यस्था राहिली नाही. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, असे आता खेदाने नमूद करावे लागत आहे. याआधी अभिजित घोसाळकर यांची हत्या झाली. आता बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. अशा हत्या होणे हे मुंबई पोलिसांसाठी, महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी. राज्यात पुन्हा असे गुन्हे घडू नयेत यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत, असेही वडेट्टीवार यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article