वारकरी आघाडीचा नामदेव शास्त्रींना इशारा:धनंजय मुंडेंच्या पाठराखणीबद्दल माफी मागा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाची धमकी

2 hours ago 1
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीने भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या शास्त्रींनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा वारकरी आघाडीने दिला आहे. राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल आबा मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. शास्त्रींनी संतोष देशमुख हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन केल्याचा आरोप करत, त्यांनी आरोपींना छुपा आश्रय दिला असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. मोरे यांनी म्हटले की, मुंडेंची मानसिकता समजून घेण्यासाठी शास्त्रींकडे वेळ होता, मात्र संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याचे त्यांना महत्त्व वाटले नाही. अनेक घोटाळे उघड झाले असतानाही मुंडेंना निर्दोष ठरवणाऱ्या शास्त्रींना खंडणीत वाटा मिळाला का, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला पुणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प समाधान महाराज देशमुख, राज्य उपाध्यक्ष मुबारकभाई शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आघाडीने स्पष्ट केले की, जर शास्त्रींनी माफी मागितली नाही, तर राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे नामदेव शास्त्रींना सवाल...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article