शहरात भटक्या कुत्र्यांनी घेतला एकाच दिवशी 12 जणांना चावा:कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला आचारसंहितेचे लागले ग्रहण‎

2 hours ago 1
शहरात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, बुधवारी १६ ऑक्टोबरला तर या भटक्या कुत्र्यांनी शहरातील उच्छाद मांडत तब्बल १२ जणांना चावा घेतला. दुसरीकडे कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम मनपाने कार्यारंभ आदेशानंतर सुरू न केल्याने आता मोहिमेला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे आता महिनाभर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत हे ग्रहण सुटणार नसल्याने मनपाची कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहिमही महिनाभर पुढे ढकलली जाणार, हे स्पष्ट झाले आहे. महापालिका क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात ३३९ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर या चालू ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात ८४ जणांना श्वानदंश झाला आहे. १६ ऑक्टोबरला एका दिवशी १२ जणांना श्वानदंश झाला. या सर्वांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात श्वानदंश प्रतिबंधक लस (इंजेक्शन) देण्यात आल्याची नोंद रुग्णालयाच्या दप्तरी आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम तातडीने राबवणे आवश्यक होते. मात्र, या कामाची निविदा मंजूर झालेल्या हिंगणी (जि. बीड) येथील युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेने कार्यारंभ आदेशाच्या मुदतीत १५ ऑक्टोबरपर्यंत काम सुरु केले नाही. त्यानंतर त्याच दिवशी आचारसंहिता लागल्याने आता हे काम सुरू करण्यास संबंधित संस्थेला अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपाच्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम आता महिनाभर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत लांबणीवर पडली आहे. ^हिंगणी (जि. बीड) येथील संस्थेला भटके कुत्रे पकडून निर्बीजीकरणाचे कंत्राट दिले होते. कार्यारंभ आदेशानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत काम सुरू करण्याची मुदत होती. नेमकी त्याच दिवशी आचारसंहिता लागल्याने आता मुदतवाढीचा पुन्हा कार्यारंभ आदेश काढता येतो का? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार आहोत. - अनिल बिडवे, कोंडवाडा विभागप्रमुख, मनपा. प्रति श्वान १,३५६ रुपये हिंगणी (जि. बीड) येथील युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या महापालिकेने मंजूर केलेल्या निविदेनुसार प्रति श्वानास निर्बिजीकरणासाठी १ हजार ३५६ रुपये दर देण्याचे ठरले होते. संस्था १५ ऑक्टोबरपासून काम सुरू करणार होती. मात्र कार्यारंभ आदेशानुसार मुदतीत काम सुरू केले नाही. शिवाय संस्थेने आपले साहित्यही येथे आणले नाही. येत्या २० ऑक्टोबरपासून निर्बीजीकरणाचे काम सुरू करु, असे संबंधित संस्थेच्या वतीने मनपाला सांगण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुदतवाढीच्या आदेशाबाबत विचारणार

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article