शिवस्मारक अरबी समुद्रात नव्हे राजभवनात व्हावे:संभाजी ब्रिगेडची मागणी,राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

2 hours ago 2
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अरबी समुद्रात न होता मुंबई येथील राजभवन या ठिकाणी व्हावे. संभाजी ब्रिगेडची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर यांनी २३ ऑगस्ट रोजी पुणे येथील मेळाव्यात घोषणा केली होती की, त्यासंदर्भात सरकारनं त्वरित निर्णय न घेतल्यास २४ सप्टेंबर पासून आम्ही राजभवनवर कुदळ मोर्चा नेणार होतो. त्या संदर्भात राज्यपालांनी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी २२ सप्टेंबर रोजी बोलावले होते. संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाची महामहिम राज्यपाल महोदयसोबत सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अरबी समुद्रात होणे शक्य नाही. त्यामुळे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला निवेदन देऊन हे स्मारक आरबी समुद्रात करण्यापेक्षा राजभवन या ठिकाणी करावं. कारण आरबी समुद्रात दहा वर्षांपूर्वी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं होतं. आजपर्यंत एक वीटही न लावता शेकडो कोटी खर्च झालेले आहे. असेच हजारो कोटी पाण्यात जाणार आणि शिवस्मारक स्वप्नच राहणार त्याचबरोबर पर्यावरणाचा प्रश्न, भरती- ओहोटीमुळे, वातावरणामुळे, पावसाळ्यात चार महिने स्मारक बंद राहणार आणि सामान्य माणसाला ते परवडणार नाही. अशा अनेक कारणांमुळे शिवस्मारक हे राजभवन या ठिकाणी व्हावे ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. राजभवन हे सुद्धा एक ४८ एकराचे बेट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल आरमार उभारल होतं. म्हणून समुद्राच्याकाठी छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक व्हावं आणि कमी पैशात ते स्मारक होईल. त्याठिकाणी म्युझियम उभारता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आदर्श आपल्याला जगभर सांगता येईल. त्या दृष्टिकोनातून हे शिवस्मारक राज्यभवन या ठिकाणी व्हावं. आणि राजभवन मंत्रालयाच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी व इतर शहरात सुद्धा केल जाऊ शकत. म्हणून आम्ही राजभवन या ठिकाणी शिवस्मारक व्हावे यासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण व इतर आरक्षण, महागाई, बेकारी, महिलांचे प्रश्न व सुरक्षा या विषयावरही चर्चा झाली. शिवस्मारकाच्या संदर्भात ते काय अंमलबजावणी करतात त्याची वाट आम्ही काही दिवस बघणार आहोत. नाहीतर संभाजी ब्रिगेड राजभवनावर कुदळ मोर्चा नेऊन शिवस्मारक करणार आहोत. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article