संजय राऊतांना जादूटोण्यातील जास्त अनुभव:त्यांच्या आरोपांवर बोलण्याची मला आवश्यकता नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

1 hour ago 1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्यापही मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात राहायला न गेल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून टीका केली जात आहे. वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये जादूटोणा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांना त्याच्यातला जास्त अनुभव आहे, याबाबत त्यांनाच विचारा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारला असता, त्यांनी संजय राऊतांच्या आरोपावर बोलण्याची मला आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया देत जास्तीचे बोलणे टाळले. संजय राऊतांना जास्त अनुभव संजय राऊत यांच्या आरोपांवर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. संजय राऊत यांना जादूटोण्यातील खूप जास्त अनुभव आहे. त्यामुळे वर्षा बंगल्याबाबत खरे काय आणि खोटे काय हे त्यांनाच विचारा, असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात युसीसी लागू होणार का? असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आम्ही सर्व जण यावर बसून चर्चा करू. त्यानंतर निर्णय घेऊन असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महापालिकेच्या ठेवी मोडल्याचा आरोप चुकीचा मुंबई महापालिकेच्या ठेवी महायुतीकडून मोडल्या जात आहेत, असा आरोप सातत्याने ठाकरे गटाकडून होत आहे. यावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. सध्या 82 हजार 800 कोटी रुपयांच्या ठेवी असूनही मुंबईतील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, असे ते म्हणाले. आरोप करणाऱ्यांना आम्ही कामातून उत्तर देतोय. त्यामुळेच मुंबईच्या तिजोरीत आज सात हजारांची भर पडली आहे. याआधी मुंबईला लुटणारे लोक होते मुंबईत आज 43 हजार कोटींची विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे एफडीबद्दलचे सगळे आरोप खोटे आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. याआधी मुंबईला लुटणारे लोक होते, त्यांना आम्ही आरसा दाखवला आहे. जे मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, त्यांना आता अडीच वर्षात कसा विकास होऊ शकतो हे आम्ही दाखवले, अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article