संभाजीनगरात ‘बुद्धलेणी बचाव’साठी आज निघणार मोर्चा, शाळांना सुटी जाहीर:क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर 4 तास आंदोलन

2 hours ago 1
बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही. तरीसुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस दिली. हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १२ धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले. परंतु नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ, उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येईल, अशी माहिती समन्वयक गौतम खरात यांनी दिली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर केली आहे. औरंगाबाद खंडपीठातील याचिकेच्या अनुषंगाने विद्यापीठाने सर्वेक्षण समिती नेमली होती. त्यानुसार विद्यापीठ परिसरातील १२ धार्मिक स्थळे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बेगमपुरा पोलिस ठाण्याने संबंधितांना नोटीस बजावली आहे. पण आंबेडकरी समुदायाने बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेले बुद्धविहार काढण्यास विरोध केला. बुद्धविहार विद्यापीठाच्या जागेवर नसून गावठाणमध्ये आहे. त्याचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र आहे. या लेणीच्या पायथ्याशी लाखो लोक विपश्यना करण्यासाठी येतात. त्याचबरोबर धम्मचक्क अनुप्रवर्तन दिनी लाखो लोकांची गर्दी असते. त्यामुळे पोलिस नोटीसीच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. क्रांती चौक-पैठण गेट-गुलमंडी-सिटीचौक- शहागंज- फाजलपुरामार्गे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ माेर्चाचे सभेत रुपांतर होईल. दहा दिवसांपासून आंबेडकरी कार्यकर्ते मोर्चाची तयारी करत आहेत. ‘धम्मभूमी के सन्मान मे भीमसैनिक मैदान मे’ हा नारा सोशल मीडियावर दिला जात आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार फडणवीस : मराठवाडा विद्यापीठ परिसरातील बुद्ध लेणी ८ व्या शतकातील आहेत. जागतिक दर्जाच्या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांप्रमाणेच ही लेणीही आहे. या लेणीच्या पायथ्याला प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राचे बुद्ध विहार आहे. हे बुद्धविहार नियमित तर होईलच. तसेच ३ दिवसांत तीर्थक्षेत्राचा दर्जाही दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले. मंत्री अतुल सावे आणि जालिंदर शेंडगे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले.धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या आधी हा निर्णय घ्यावा, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला आहे. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article