संविधान अन् महाराष्ट्र वाचवायचा असेल तर जाती-धर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांचे प्रतिपादन

3 hours ago 1
माणूस म्हणून जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. राजे-महाराजे तथा तत्कालीन महापुरुषांना जातिभेदाचा कलंक लावून समाजातील विशिष्ट घटकांनी आपला स्वार्थ साध्य केला आहे. आजही ही लोकं जाती आणि धर्मात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे आपले राज्य (महाराष्ट्र) आणि संविधान धोक्यात आले आहे. परिणामी जाती धर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून खरे सुराज्य निर्माण करा, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांनी केले. लोकनेते माजी आमदार दिवंगत संजयभाऊ बंड यांच्या जयंतीनिमित्त येथील सांस्कृतिक भवनात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त्याने महाराष्ट्र बचाओ-संविधान बचाओ अभियान अंतर्गत प्रा. श्याम मानव बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते दशरथ मडावी, अनिसचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, शिवसेनेच्या नेत्या प्रीती बंड, अंनिसचे प्रदेश संघटक ॲड. गणेश हलकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव या विषयावर पुढे बोलताना प्रा. श्याम मानव म्हणाले की, हुकूमशाहीला आपण आवर घालू शकतो हे लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. मोदी सरकार बहुमतात असते तर आज अनेक लोक तुरुंगात असते असे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते. परंतु महाराष्ट्राने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. देशात आज विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुकीची व अवैध काम सुरू आहेत. कायद्याचा धाक लोकांना राहिला नाही. याकरिता सध्याचे भाजप सरकार कसे जबाबदार आहे, हे अनेक उदाहरणे व दाखले देत त्यांनी पटवून दिले. प्रा.श्याम मानव यांनी भारतीय संविधानाला असलेले धोके, देशासमोर असलेली मोठी संकटे आणि शेतकरी-युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षण व आरोग्याची स्थिती यावरही अभ्यासपूर्ण विवेचन केले. आदिवासी समाजासोबतच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीत ४० वर्ष सेवा करणारे दशरथ मडावी यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून धर्मांध लोकांवर प्रखर टीका केली.या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. या संविधानामुळेच आपला देश एकसंघ आहे. या ठिकाणी सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. २०१४ पर्यंत या देशात लोकशाही होती. परंतु त्यानंतर हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली. देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या लोकांना हद्दपार केले पाहिजे. लोकसभेसारखेच येत्या विधानसभेत सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने संबंधितांना घरी बसविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article