हिंदूंच्या तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ:नीतेश राणे यांचा इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर निशाणा

2 hours ago 2
एमआयएमच्या वतीने मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्या या मुंबईला निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. या रॅलीचे नेतृत्व खासदार इम्तियाज जलील करत आहेत. यावर भाजप आमदार नीतेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. भाजप आमदार नीतेश राणे म्हणाले, जे काही जिहादी मुंबईला जमत आहेत त्यांच्या हातात तिरंगा कसेकाय हेच मला समजत नाहीये. त्यांचा आणि तिरंग्याचा काय संबंध हे पहिल्यांदा त्यांनी मला सांगावे. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जे काही रॅली निघाल्या त्यात पॅलेस्टाईनचे झेंडे कसेकाय फडकावले गेले? सर तन से जुदाच्या घोषणा कसेकाय देण्यात आल्या? आया-बहिणींवरून घाणेरड्या घोषणा कसेकाय देण्यात आल्या? मंदिरांच्या बाहेर जोरजोरात डीजे कसेकाय लावण्यात आले? तुम्ही जर संविधानाला मानत असाल तर या भारत देशामध्ये 90 टक्के हिंदू इथे राहतात, मग इथे सर तन से जुदाच्या घोषणा कसेकाय दिल्या जातात? पाकिस्तान जिंदाबाद कसेकाय आम्हाला ऐकायला मिळते? आज जे मुंबईमध्ये जिहादी जमले आहेत त्यांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तरे द्यावे, असे आव्हान नीतेश राणे यांनी केले आहे. हिंदूंच्या तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ नीतेश राणे म्हणाले, यांच्या हातात संविधान शोभत नाही. यांनी आधी आमची भगवद्गीता वाचावी. ती जर वाचली असती तर आज ही रॅली काढायची वेल असली नसती. आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आम्ही हिंदूंची बाजू लाऊन धरतोय. हिंदूंच्या तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ. हा संदेश आम्हाला या लोकांना द्यायचा आहे. हिंदू पण मुंबईत जमू शकतात नीतेश राणे म्हणाले, हे जे काही मुंबईत तिरंगा हातात घेऊन नाटक आणि नौटंकी करून जमले आहेत त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही? संविधानात सर्व धर्म समभाव हेच लिहिले आहे न? मग गणपतीच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीवर तुम्ही काही बोलत नाहीत. मग तुम्ही आता संविधानाची भाषा कशी बोलता? म्हणून हिंदूंना घाबरवण्याचा प्रकार हे मुंबईत येऊन जर होत असेल तर हिंदू पण मुंबईत जमू शकतात, हिंदू पण आपली ताकद दाखवू शकतात. हिंदूंनी मुंबईत जमा होण्याचे ठरवलेच तर मुंबई सुद्धा लहान पडेल, एवढी मोठी ताकद हिंदूंची आहे एवढे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नीतेश राणे यांनी दिला आहे. अतिरेक्यांचा जयजयकार पुढे बोलताना राणे म्हणाले, हा काही तुमच्या अब्बाचा पाकिस्तान नाहीये, इथे येऊन तुम्ही काहीही बोलणार, काहीही घोषणा देणार. अकोला दौंडमध्ये जाऊन पाकिस्तान पॅलेस्टाईनचे झेंडे, अतिरेक्यांचे फोटो त्यांच्या जुलूसमध्ये दाखवून त्यांचा जयजयकार केला. ज्यांनी आपल्या देशावर बॉम्ब हल्ले केले, अतिरेकी कारवाया केल्या त्यांचे फोटो तुम्ही ईदच्या जुलूसमध्ये दाखवता आणि जयजयकार करता याला तुम्ही संविधान मानणे बोलतात? तुम्ही तुमच्या जिहाद्यांना आधी आवरा, सर तन से जुदाच्या घोषणा थांबवा. ज्यांच्या इस्लाममध्ये जे गैरमुस्लिम आहेत ते दर्जहीन, नीच आणि काफिर आहेत असे लिहिले असेल तर ते आमच्या गणपतीच्या मिरवणुकीवर दगडेच मारणार, याचा निषेध तुम्ही केला आहे का? आम्ही हिंदूंनीच आमच्या देशात आमचे सण साजरे करायचे नाहीयेत का? आमचे परमपूज्य रामगिरी महाराज जे काही बोलले आहेत ते यांच्या झाकीर नाईकने बोलले आहे. आधी त्याचे सर तन से जुदा करून दाखवा, मग आमच्या रामगिरी महाराजांकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करा, असे थेट आव्हानच नीतेश राणे यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article