2 कोटी 44 लाख लिटर पाणी वाया,संगमला कालव्याचा जलसेतू फुटला:कालवा तातडीने दुरुस्त करुन रब्बीला पाणी सोडण्याची मागणी

2 hours ago 2
माळशिरस तालुक्यातील संगम येथे उजनीच्या उजव्या कालव्याला बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवाय लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन त्यांच्या उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेली १५ महिन्यांपूर्वी दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी हा कालवा याच ठिकाणी फुटून कालव्यातील पाण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. ^उजनी उजव्या कालव्याची रबर पंधरा महिन्यात कशी तुटली, हे काम निकृष्ट दर्जाचे केले होते, याची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र कारवाई केली नाही. हा रबर प्रत्येक वेळी कोणत्या कंपनीकडून घेतला जातो, याची चौकशी होऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच कालवा तातडीने दुरुस्त होऊन रब्बीसाठी पुन्हा पाणी सोडले पाहिजे. -गणेश इंगळे, युवा सेना, जिल्हा प्रमुख यावर्षी उजनीतील पाणी साठ्याची टक्केवारी जास्त असताना कालव्यास या रब्बी हंगामासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले होते. तोपर्यंत बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास या कालव्याची पुन्हा त्याच ठिकाणी म्हणजे १४ नंबरची रबर तुटून कालव्याला भगदाड पडले. तेव्हापासून गुरुवारी दुपारपर्यंत पाणी तसेच वहात होते.पाणी बंद केले तरी सायंकाळपर्यंत कमी दाबाने का असेना वाहतच होते. त्यानंतर यथावकाश या कालव्याची तुटलेली रबर जोडून पूर्ववत करण्यात आली. मात्र लगत शेतकरी तसेच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे आदींनी मागणी करूनही पाटबंधारे विभागाच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कसलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. १५ महिन्यांत रबर कसा तुटला, चौकशी करा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article