Maharashtra Breaking News LIVE 3rd Feb 2025 : भविष्यात राजापूरमध्ये शत प्रतिशत शिवसेनाच दिसली पाहिजे – किरण सामंत

3 hours ago 1

वनमंत्री तसेच पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून आज नवी मुंबईत जनता दरबारचे आयोजन. गणेश नाईक नवी मुंबईत जनता दरबार भरवतात, मात्र वनमंत्री व पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच हा जनता दरबार असणार आहे. आतापर्यंत जनता दरबार भरवून गणेश नाईकानी अनेकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रशासन आणि नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा हा उपक्रम असणार आहे. ‘भविष्यात राजापूरमध्ये शत प्रतिशत शिवसेनाच दिसली पाहिजे’ राजापूर विधानसभेचे शिवसेना आमदार किरण सामंत यांचे वक्तव्य. “नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे. ही सर्व जवाबदारी आपल्या शिवसैनिकांची” असं किरण सामंत म्हणाले. राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघातील कार्यक्रमात किरण सामंत यांचे वक्तव्य.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article