देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी का घाबरत आहेत?:रामदास कदम हे रामदास स्वामी नाही- संजय राऊत

2 hours ago 1
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी का घाबरत आहेत, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, त्या जागेवर नवीन बंगला बांधला जाणार असे ऐकू येत आहे. रामदास कदम हे रामदास स्वामी नाही असे म्हणत त्यांनाही टोला लगावला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, निर्मला सीतारमण यांना मी खडूस म्हटलो कारण अर्थमंत्रीपदावरची व्यक्ती खडूसच असते, कठोर असते. त्यांना फक्त देशाच्या तिजोरीत महसूल जमा करायचा असतो, त्यासाठी ते लोकांच्या खिशात हात घालायचा आणि कुणाची पाकीटे मारायची यासाठी अर्थमंत्र्यांची नेमणूक असते. नेमके राऊत काय म्हणाले? संजय राऊत म्हणाले की, रामदास कदम हे काही रामदास स्वामी नाही की त्यांचे कुणी ऐकले पाहिजे. काळ्या जादू विषयी कुणी बोलावे, ती अंधश्रद्धा आहे. ते देवेंद्र फडणवीस वर्षावर राहायला का जात नाही यांचे उत्तर रामदास कदम यांनी द्यावे. किंवा भाजप प्रवक्त्याने द्यावे. फडणवीसांसह कुटुंबीय तिथे राहायला का जात नाही. तिथे असे काय घडले आहे की घडवले आहे. संजय राऊत म्हणाले की, वर्षा बंगल्याची प्रतिष्ठा का गेली आहे. मुख्यमंत्रीपद आणि वर्षा बंगला यावर जाण्यासाठी धरपडत असतात. वर्षा बंगला पाडून तिथे नवी इमारत बांधण्याचे यांनी ठरवले आहे. तिथे नेमके काय घडले आहे. म्हणून अर्थमंत्र्यांची नेमणूक संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान पदावरील व्यक्तीला लोकांशी वाईटपणा घ्यायचा नसतो म्हणून अर्थमंत्र्यांची नेमणूक केलेली असते. तो काही फार मोठा विषय नाहीये. आपल्या बजेटमध्ये महागाई कमी करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी काही योजना आहेत का? तर नाही मग मध्यमवर्गीयांचे भले कसे होणार असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा नाही संजय राऊत म्हणाले की, रुपया ज्या पद्धतीने कोसळला आहे, तो मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का तर त्याही अजिबात नाही. 12 लाखांपर्यंत टॅक्सचा मुद्दा सोडला तर मध्यमवर्गीयांना दिलास नाही. पण 12 लाख रुपये इन्कम आज कुणाकडे आहे. अनेक ठिकाणी उच्चशिक्षात लोकं कंत्राटी म्हणून काम करत आहे. त्यांचे उत्पन्न हे उघडपणे कागदावर येत नाही. साडे 3 ते 4 लाख लोकं टॅक्स भरत आहे, त्यात 12 लाख वाले किती आहेत. याचा खूलासा अर्थमंत्र्यांनी करावा. बजेट कळण्यासाठी किमान 72 तास लागतात. मोदींनी संसदेत बाकं वाजवले त्यांना काय अर्थसंकल्प कळला, असा सवालही राऊतांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा शिस्त लावण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणाले की, मंत्र्यांना सचिव नेमण्याचे अधिकार नाही. केंद्रामध्ये जसे मोदींच्या मंत्रिमंडळात आहे तेच महाराष्ट्रात फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होत आहे. शिस्त म्हणून ते योग्यच आहे. मुख्यमंत्र्यांनी शिस्त म्हणून हे ठरवले असेल तर ह्यावर टीका करण्यासारखे काही नाही. पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंवर त्यांचे लोकं 2 अडीच वर्षांपूर्वी जसे मोकाट सुटले होते की आम्ही सांगू तसेच राज्य चालेल. त्याला जर मुख्यमंत्र्यांनी लगाम घालत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला असेल तर योग्यच आहे. ठेकेदारांना पैसे का मिळत नाही संजय राऊत म्हणाले की, मंत्र्यांचे सचिव हे व्यवहार करणारे, मंत्र्यांच्या वतीने पैसे जमा करणारे यावर जर देवेंद्र फडणवीस यांनी नियंत्रण आणले असेल तर त्यावर टीका करण्याची गरज नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये फुटीर आमदारांच्या खिशात किती पैसे गेले ते लोकांना माहिती आहे. ठेकेदारांना त्यांचे पैसे का मिळत नाही. त्यांत मुख्यमंत्र्यांना दलाली दिसत असल्याने ते पैसे ठरवले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article