शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली:सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप; हे प्लान्ड नव्हे तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप
2 hours ago
1
शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढल्याचा दावा भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी केला आहे. शिर्डीत सोमवारी पहाटे शिर्डी संस्थानच्या 3 कर्मचाऱ्यांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात 2 जण ठार झालेत. या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी हा दावा केला आहे. सुजय विखे पाटील म्हणाले की, सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास शिर्डी संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांनी निर्घृण हत्या करण्यात आली. खरेतर अशी घटना काही पहिल्यांदाच घटना घडली नाही. ही अचानक झालेली एक निर्घृण हत्या आहे. पहाटे 4-5 च्या सुमारास ही घटना घडली तेव्हा सर्वजण झोपेत होते. त्यामुळे हत्येचा निरोप येता-येता 6-7 वाजले. दोन मृतदेह वेगवगळ्या स्पॉटवर आढळले. एका जखमीवर प्रवरा मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. तो धोक्याबाहेर येईल अशी अपेक्षा आहे. माझे डॉक्टरांशी अजून बोलणे झाले नाही. मोफत अन्नछत्र व मोफत शिर्डी करून ठेवण्यात आली आहे. यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली आहे. मी जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो हे महाराष्ट्राच्या लक्षात येईल. हे प्लान्ड मर्डर वाटत नाहीत. हे नशेमध्ये होणारे रँडम मर्डर आहेत. यावर राजकारण करण्याची गरज नाही. पण जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. हे हत्याकांड व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलांनी केले असावे. वेगवेगळ्या ठिकाणी जो सापडेल, त्याच्यावर हल्ला करून पैसे काढण्याचा हा प्रकार आहे. यात जातीपातीचा विषय नाही. हे नशेखोरांचे कृत्य आहे. पोलिस हल्लेखोरांच्या लवकरच मुसक्या आवळतील. पोलिसांना या घटनेची पहाटे साडेपाचच्या सुमारास माहिती देण्यात आली. त्या कर्मचाऱ्याने हा अपघात असल्याचा दावा केला. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. त्याला मर्डर व अपघातामधील फरक कळला नाही. त्यामुळे त्याला पोलिस ठाण्यात राहण्याचा अधिकार नाही, असेही सुजय विखे यावेळी बोलताना म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे शिर्डी संस्थानच्या सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजुळ यांची आज पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे शिर्डी येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे ही वाचा... साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली:साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने भोसकून हत्या, सोमवारी पहाटे घडला थरार अहिल्यानगर - शिर्डीच्या साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने भोसकून निर्घृपणे हत्या करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हत्याकांडामुळे शिर्डी चांगलीच हादरली आहे. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)