गंगास्नानाने त्वचा स्वच्छ होईल, मन स्वच्छतेसाठी भागवत कथा एकमेव मार्ग:पाचोरे बुद्रुक येथे भागवताचार्य चिरडे बाबा यांचा उपदेश‎

2 hours ago 2
गंगास्नानाने त्वचा स्वच्छ होऊ शकते. पण मनाची स्वच्छता करण्यासाठी भागवत कथा प्रत्येक व्यक्तीसाठी एकमाद्वितीय मार्ग आहे, असा उपदेश भागवताचार्य चिरडे बाबा यांनी केले. बुधवारी (दि. ५) सीताराम आंधळे संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेत ते बोलत होते. कथा सोहळ्याचे ध्वजारोहण मालेराज चिरडे बाबा यांच्या हस्ते तर कथा सभागृहाचे उद्घाटन मयंकराज बाबा महानुभाव यांच्या हस्ते झाले. भागवत कथा श्रवनाने पूर्वजांचा उद्धार होतो. जो भक्त श्रीकृष्णाला शरण येतो त्याचे विधी लिखित मरणही टळते, असे भागवताचे महात्म्य असल्याचे सुंदर वर्णन चिरडे बाबांनी केले. भक्ताची ओळख करून देताना तो कसा असावा हे आपल्या वाणीतून प्रतिपादन करताना धर्म हा समर्थांचा आहे, भित्र्यांचा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. श्रीमद भागवत कथा सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भक्त मंडळी उपस्थित होती. पाचोरे व पंचक्रोशीतील ५ हजारांपेक्षा जास्त भाविकांनी पहिल्याच दिवशी कथा श्रवण केली. पहिल्या दिवसाच्या कथा सोहळ्याचे प्रमुख आकर्षण लकी ड्रॉ काढून ११ महिलांना पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले. कथेत भाविक तल्लीन झाले होते. श्रीमद् भागवत कथेस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. यासाठी परिसरात असंख्य भगवे ध्वज लावण्यात आले असून वातावरण भक्तिमय झाले. कथेच्या प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळी काढत भक्तांचे स्वागत करण्यात आले. भागवताचार्य चिरडे बाबा यांना रथावर बसवून सभास्थळापर्यंत नेण्यात आले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article