छत्रपतींविषयी वादग्रस्त बोलून महाराष्ट्र अशांत करण्याचा कट:मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा आरोप; राहुल सोलापूरकर यांच्या चौकशीची मागणी
2 hours ago
2
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी यासंबंधी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाची खोलात जाऊन चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांना लाच देऊन आपली आग्र्याहून सुटका केल्याचा दावा केला होता. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपरोक्त संशय व्यक्त केला आहे. ते येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राहुल सोलापूरकर यांनी कोणत्या हेतूने वक्तव्य केले, त्याच्या खोलात सरकारने गेले पाहिजे. या माध्यमातून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा डाव आहे का? हेही सरकारने तपासले पाहिजे. वादग्रस्त बोलायचे आणि राज्य अशांत करायचे, हा खेळ चाललेला आहे, असे मला तरी वाटते. सोलापूरकरांनी माफी मागितली, पण उपयोग नाही कलाकार असल्यामुळे आम्हाला समजातले सगळे कळते असे त्यांना वाटते. पण तुम्हाला जर सर्वकाही कळत असते, तर तुम्ही छत्रपतींच्या बाबतीत चुकीच्या पध्दतीने आणि इतिहासाबद्दल एवढ्या बिनधास्तपणे बोलला नसता. राहुल सोलापूरकर यांनी आपल्या विधानाप्रकरणी माफी मागितली असली तरी त्याचा काही उपयोग नाही. सरकारने त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी यावेळी केली. जो इतिहास आपण वाचलाय. त्यात छत्रपतींनी लाच देऊन आग्र्याहून सुटका करून घेतल्याचे लिखाण नाही. छत्रपतींचा मुत्युद्दीपणा दाखवण्याचेच काम इतिहासकारांनी केले. त्यामुळे सोलापूरकरांच्या वक्तव्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. महापुरुषांबद्दल अशा पध्दतीने पुन्हा कोणी वक्तव्य करू नये, अशी कडक कारवाई सरकारने त्यांच्यावर करावी. अशा कारवाईचे उदाहरण समोर ठेवल्याशिवाय अशी लोकं सुधारणार नाहीत, असेही ते यावेळी सोलापूरकर यांच्या विधानाचा निषेध करताना म्हणाले. हे ही वाचा... बापाच्या डोळ्यापुढे मुलाला कारने चिरडले:वडील मोबाईलमध्ये होते गुंग, मागून धावत आलेला मुलगा थेट कारखाली आला; पाहा VIDEO नाशिक - मोबाईलमध्ये गुंग असणाऱ्या एका व्यक्तीच्या 5 वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची भयंकर घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात मयत मुलगा वडिलांच्या पाठीमागून धावत येत थेट कारच्या चाकाखाली जाताना दिसत आहे. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)