‘जैश’शी संबंधांचा संशय:दोन जणांच्या बँक व्यवहारांची ‘एनआयए’कडून कसून चौकशी

2 hours ago 1
देशात घातपात करणाऱ्या जैश-ए-मोहंमद या संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून देशातील पाच राज्यांत छापे मारण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागातील अल्तमश कॉलनी आणि रहमानिया कॉलनी येथील दोन तरुण व जालन्याच्या एका तरुणाला जैशच्या संपर्कात असल्याचा संशय एनआयएला (राष्ट्रीय तपास यंत्रणा) होता. या प्रकरणात तिघांच्याही बँक खात्याची कसून चौकशी केली. बँक व्यवहारांची माहिती घेऊन त्यांना १४ तासांनी सोडून देण्यात आले होते. शनिवारी (५ ऑक्टोबर) राज्यात एकाच वेळी चार ठिकाणी एनआयएने पहाटे पावणेतीन वाजता छापेमारी केली होती. सकाळी घरात अधिकारी शिरल्यानंतर त्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखवून सर्वांचे मोबाइल जप्त केले. जैश-ए-मोहंमदच्या ही संघटना देशात घातपात करण्याचा कट आखत आहे, या संशयावरून दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. याच्याच तपासाचा भाग म्हणून शहरात दोघांची चौकशी केली होती. एनआयएने छापा मारल्यानंतर संशयितांना वेगळ्या खोलीत नेऊन विविध प्रश्न विचारले. मूळ गाव कुठले? घरात कोणी सीमावर्ती भागात गेले का? असे प्रश्न विचारले. संशयितांचे मोबाइल पथकाने जप्त केले आहेत. एनआयएने तिघांना त्यांच्या कुठे कुठे बँक खाते आहेत का? कोणामार्फत पैशांचा व्यवहार करता का? असे प्रश्न विचारले. बँक पासबुकवरील प्रत्येक एन्ट्रीचा तपशील चौकशी अधिकाऱ्यांनी मागितला. तिघांपैकी एक विदेशात गेल्याने त्याच्या पासपोर्टची देखील चौकशी केली होती. घरातील प्रत्येक डब्याची पथकाने घेतली झडती संशयितांच्या घरी छापा मारल्यानंतर पथकाने कपाट, सुटकेस व मौल्यवान वस्तूंची तपासणी केली. महिला अधिकाऱ्याने स्वयंपाकघरातील डब्यांचीही झडती घेतली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article