दमानियांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला:बैठकीत काय निर्णय होणार, मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार?

2 hours ago 1
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर 275 कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना तातडीने बोलावून घेतले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना त्यांच्या खात्यात झालेल्या कथित गैरव्यवहाराची कागदपत्रे मांडली आहे. यामुळे महायुतीचे प्रतिमा मलिन होऊ शकते. यामुळे अजित पवार त्यांचा राजीनामा मागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. अजितदादांनी पाठराखण करू नये- जरांगे दरम्यान अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेतनंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत अजितदादांना सर्व गोष्टी माहिती असून ते पाठराखण करता की काय? असा प्रश्न आम्हाला पडतोय. पापी लोकांची पाठराखण करण्याचे काम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी करू नये असे म्हटलंय. नेमके प्रकरण काय? धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात तब्बल 275 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दमानिया यांनी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देते, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असा दावा दमानिया यांनी केला. धनंजय मुंडे हे मंत्री होण्याच्या योग्यतेचे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. अजितदादा पाठराखण करता का?- जरांगे पाटील अजित दादांना सर्व गोष्टी माहिती असून ते पाठराखण करता की काय? असा प्रश्न आम्हाला पडतोय. पापी लोकांची पाठराखण करण्याचे काम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून पुरावे नष्ट करण्याचे काम केले आहे. आरोपीचे दुखत नसून देखील कराडला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मागणीनुसार आरोपीला लातूरचे जेल दिले जाते. ज्याचा अर्ज करतील ते पुरावले जात आहे. मात्र लोक सांगत आहेत याची चौकशी करा, त्याची चौकशी होत नाही. हॉस्पिटल मधील डॉक्टरांची चौकशी होत नाही. तसेच चौकशी झालीच तरी कारवाई केली जात नाही. त्याचा अर्थ धनंजय मुंडे बाहेर आरोपी बाहेर सांभाळण्यासाठी फिरत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. अजित पवार कार्यकर्त्यांना काय म्हणाले होते? बीड जिल्ह्यामध्ये कोणी कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार असेल आणि जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा विकास कामांत अडथळा आणणारा असेल तर ते खपवून घेणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. गरज वाटल्यास अशा लोकांवर मकोका लावायला देखील मी मागेपुढे पाहणार नाही. जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल. मात्र तथ्य नसेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. महायुतीमधील सर्व वरीष्ठ नेत्यांशी मी संपर्कात आहे. त्यामुळे खालचे कार्यकर्ते काय बोलतात, त्यावर उत्तर देण्यास मी बांधील नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारला इतरांनी कोणीही सल्ला देऊ नये. महायुती सरकारमध्ये नैतिकता आहे, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी वारंवार मागणी होत आहे. या मागणीला अजित पवार यांनी फेटाळले आहे. निर्दोष व्यक्तीवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई व्हायला नको, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट काही दिवसांपूर्वी बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. मात्र आता धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. अंजली दमानिया यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहे. सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझा राजीनामा मागू शकतात- धनंजय मुंडे माझी नैतिकता ही माझ्या जनतेसोबत आहे. माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी नाही, असा दावा करत राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मला टार्गेट केले जातेय. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करा, अशी माझीही मागणी आहे. मात्र या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असे पुन्हा सांगतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी जर दोषी वाटत असेन तर माझा राजीनामा घेण्याचा त्यांना अधिकार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article