दिव्यांग शेतकऱ्याच्या आत्महत्येचा निषेध:प्रहार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध

2 hours ago 2
छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. दिव्यांग शेतकरी त्र्यंबक धोत्रे यांच्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संघटनेने कार्यालयासमोर पिंडदान केले. घटनेची पार्श्वभूमी अशी की, २६ जानेवारीला दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने निराश झालेल्या दिव्यांग शेतकरी त्र्यंबक धोत्रे यांनी २७ जानेवारीला जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. शहागंज येथून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास तयार नाहीत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोन उचलत नाहीत. प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी आंदोलकांना कार्यालयाच्या गेटवरच अडवले, त्यामुळे सुमारे दीड तास गेटसमोरच आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी रस्त्यावरच पिंडदानाची प्रक्रिया पार पाडली. आंदोलनाचे फोटो...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article