नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 50 कोटींचा निधी देणार- आ बोरनारे:विविध विकास कामाच्या शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमात केली घोषणा
2 hours ago
1
वैजापूर शहरातील रहिवासी कुंटुबांना दररोज पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपलिकेने ५० कोटी खर्चाचा नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीला पाठवला असल्याची महिती शिवसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली.नगरविकास विभागाच्या निधीतून श्रीराम कॉलनी व साईनाथ नागरी वसाहतीत आ बोरनारे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या पावणे पाच कोटी निधीतील विकास कामाचे लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात बोरनारे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते.माजी सभापती बाबासाहेब जगताप, संजय निकम ,डॉ. राजीव डोंगरे, ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र सांळुके,पारस घाटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. नगरपलिकेने २०१२ या वर्षात लोकार्पण केलेल्या अर्धवट पाणीपुरवठा योजनेत साठवण क्षमतेसाठी पुरेसे जलकुंभाची निर्मिती न केल्याने रहिवासी कुंटुबांना पिण्यासाठी दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याची बाब डिसेंबर महिन्यात नगरपालिका प्रशासनाच्या बैठकीत समोर आल्याचे आ. बोरनारे यांनी स्पष्ट केले. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती न केल्याने बंदस्थितीत असून नागरिकांना तीन ते चार दिवसाआड थातूर-मातूर प्रक्रिया केलेले पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन दिले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यामुळे नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करण्यासाठी ५० कोटींचा नवीन प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहराला नवीन वर्षात निधीचे गिफ्ट देण्याचे साकडे घातल्याचे बोरनारे यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोपात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी स्वातंत्र्य नंतर वैजापूर मतदारसंघात आ.बोरनारे यांनी तीन हजार कोटींचा विकास निधी उपलब्ध करुन देण्याचा विक्रम करणारे ते लोकप्रतिनिधी असल्याचे म्हटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन टी.एन. मोईन यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती. नवीन पाणीपुरवठा योजनेतील प्रस्तावात अशा आहेत तरतुदी ५० हजार लोकसंख्येच्या शहरात २०१३ ते २०४१ पुढील तीस वर्षापर्यत लोकसंख्या गृहीत धरुन पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करण्यात आले होते. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज १२० लाख लिटर पाणी साठा आवश्यकता आहे. मात्र, साठवण क्षमता ७० लाख लिटर असल्यामुळे शहरी भागात दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने तीन ते चार दिवसाआड नळाला पाणीपुरवठा केला जातो. ५० कोटीच्या नवीन प्रस्तावात नवीन आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प व वाढीव तीन जलकुंभ निर्माण करुन शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)