'शक्तिपीठ महामार्गावरून हेमंत पाटील यांना बोलण्याचा अधिकारच नाही':वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
2 hours ago
1
शक्तिपीठ महामार्गाला हिंगोली जिल्हयातील शेतकरी आनंदाने जमीनी देण्यास तयार आहेत. या आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तिव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. मुळात नांदेड जिल्हयातील असेलल्यांना आमच्या जमीनीबाबत बोलण्याचा अधिकारच नसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्गा हिंगोली जिल्हयातून जात आहे. या महामार्गासाठी कळमनुुरी व वसमत तालुक्यातील सुमारे २० पेक्षा अधिक गावातील जमीनी संपादीत केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे बागायती असलेल्या जमीनी शासनाकडून कवडीमोल दराने संपादीत करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. त्यासाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र आ्रंदोलन देखील केले आहे. दरम्यान, नांदेड येथेे माजी खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी हिंगोली जिल्हयातील शेतकरी आनंदाने जमीनी देण्यास तयार असल्याचे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. या महामार्गामुळे होणारे फायदे देखील त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी सडकून टिका केली आहे. या संदर्भात ॲड. केतन सारंग यांनी सांगितले की, आमदार हेमंत पाटील हे खासदार असतांना त्यांनी हिंगोली जिल्हयातील प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. ते नांदेड जिल्हयातील असून त्यांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना कशा कळणार. केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारला खुष करण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे. आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. शेतकरी संघटनेचे नामदेव पतंगे यांनी सांगितले की, शासनाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असून दुसरीकडे आता महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी घेऊन त्यांना रस्त्यावर आणमण्याचे काम केले जात आहे. या महामार्गाला हिंगोली जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विरोध करावा. याबाबत शेतकरी गजानन कावरखे यांनीही आमदार पाटील यांच्या वक्तव्यावर टिका केली. सरकारने निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही, आता पिकविमा, दुष्काळी अनुदान मिळाले नाही. या प्रश्नावर बोलण्या ऐवजी आमदार पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गावर बोलून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी संघटना पुर्ण ताकदीनिशी विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)