मराठवाड्यातील तिघांनी मराठा आरक्षणासाठी संपवले जीवन:स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बदनापूरच्या तरुणीसह अन्य दोन जणांचा समावेश
2 hours ago
1
मराठवाड्यात तीन जणांनी मराठाआरक्षणासाठी आत्महत्या केली.जालना जिल्ह्यातील बदनापूर येथीलराणी नाईकवाडे या तरूणीने राहत्याघरी गळफास घेतला. ती पुण्यातखासगी कंपनीत नोकरी करून स्पर्धापरिक्षेची तयारी करत होती. मात्र,मराठा आरक्षण मिळत नसल्याने तिनेनैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले.तर सिल्लोड तालुक्यातील खुपटायेथील तरूणाने शेततळ्यात उडीघेतली. तर बीड जिल्ह्यातीलजिरेवाडी येथील तरूणानेदेखीलमराठा आरक्षणासाठी झाडालागळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल व्यंकट ढेंगे(२५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नावआहे. त्याने ३१ जानेवारी रोजी गावातीलच मोहन मोहिते यांच्याशेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मराठासमाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावाकुटुंबियांनी केला आहे. मृत अमोल मराठा आरक्षण चळवळीतसक्रीय होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात त्याने सहभाग घेतलाहोता. त्यामुळे आरक्षण मिळावे यासाठी त्याने आत्महत्या केल्याचेकुटुंबियांचे म्हणणे आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यातदिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ‘गरजवंत मराठा समाजाला आता तरी आरक्षणद्या, एक मराठा लाख मराठा’अशी सुसाइड नोटलिहून खुपटा (ता.सिल्लोड) येथील ३८ वर्षीययुवकाने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवार, १ रोजीमध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. समाधानरायभान काळे असे मृताचे नाव आहे. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात समाधानकाळे सुरुवातीपासूनच सहभागी होते. शनिवारी मध्यरात्री ते अचानकघराबाहेर पडले अन् शेततळ्यात उडी घेतली. कुटुंबातील सदस्य वनातेवाइकांनी २० तास त्यांचा शोध घेतला. शनिवारी सायंकाळीशेततळ्यातील पाण्यावर चपला तरंगताना आढळल्या. त्यानंतरछत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाच्या पथकाने शनिवारीमध्यरात्री मृतदेह बाहेर काढला. अजिंठा पोलिस ठाण्यात घटनेची नोंदकरण्यात आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. उच्चशिक्षित असूनही शासकीय नोकरी मिळतनसल्याच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणीनेगळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटनाबदनापूर येथे घडली. राणी साहेबराव नाईकवाडे असे मृत तरुणीचेनाव आहे. राणी ही विज्ञान शाखेची पदवीधर होती. तिने काही स्पर्धापरीक्षा दिल्या होत्या. आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळतनाही. या विवंचनेत तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्याकेली, अशी माहिती मुलीचे नातेवाईक व सरपंच सोपान नाईकवाडेयांनी दिली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुणे येथे एका खासगी कंपनीतजॉब मिळविला होता. दरम्यान, राणी ही काही दिवसांपूर्वी पुणे येथूनबदनापूरला आई-वडिलांकडे आली होती. यातच तिने हे टोकाचेपाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरूणीच्यापश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बीडतालुक्यातील जिरेवाडी येथे तरुणाने गळफास घेतआत्महत्या केल्याची घटना ३१ जानेवारी रोजीघडली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूचीनोंद करण्यात आली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)