मराठवाड्यातील तिघांनी मराठा आरक्षणासाठी संपवले जीवन‎:स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बदनापूरच्या तरुणीसह अन्य दोन जणांचा समावेश‎

2 hours ago 1
मराठवाड्यात तीन जणांनी मराठा‎आरक्षणासाठी आत्महत्या केली.‎जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील‎राणी नाईकवाडे या तरूणीने राहत्या‎घरी गळफास घेतला. ती पुण्यात‎खासगी कंपनीत नोकरी करून स्पर्धा‎परिक्षेची तयारी करत होती. मात्र,‎मराठा आरक्षण मिळत नसल्याने तिने‎नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले.‎तर सिल्लोड तालुक्यातील खुपटा‎येथील तरूणाने शेततळ्यात उडी‎घेतली. तर बीड जिल्ह्यातील‎जिरेवाडी येथील तरूणानेदेखील‎मराठा आरक्षणासाठी झाडाला‎गळफास घेऊन आत्महत्या केली.‎ अमोल व्यंकट ढेंगे(२५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव‎आहे. त्याने ३१ जानेवारी रोजी गावातीलच मोहन मोहिते यांच्या‎शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मराठा‎समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावा‎कुटुंबियांनी केला आहे. मृत अमोल मराठा आरक्षण चळवळीत‎सक्रीय होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात त्याने सहभाग घेतला‎होता. त्यामुळे आरक्षण मिळावे यासाठी त्याने आत्महत्या केल्याचे‎कुटुंबियांचे म्हणणे आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात‎दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.‎ ‎‘गरजवंत मराठा समाजाला आता तरी आरक्षण‎‎द्या, एक मराठा लाख मराठा’अशी सुसाइड नोट‎‎लिहून खुपटा (ता.सिल्लोड) येथील ३८ वर्षीय‎युवकाने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवार, १ रोजी‎मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. समाधान‎रायभान काळे असे मृताचे नाव आहे.‎ जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात समाधान‎काळे सुरुवातीपासूनच सहभागी होते. शनिवारी मध्यरात्री ते अचानक‎घराबाहेर पडले अन् शेततळ्यात उडी घेतली. कुटुंबातील सदस्य व‎नातेवाइकांनी २० तास त्यांचा शोध घेतला. शनिवारी सायंकाळी‎शेततळ्यातील पाण्यावर चपला तरंगताना आढळल्या. त्यानंतर‎छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाच्या पथकाने शनिवारी‎मध्यरात्री मृतदेह बाहेर काढला. अजिंठा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद‎करण्यात आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.‎ ‎उच्चशिक्षित असूनही शासकीय नोकरी मिळत‎‎नसल्याच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणीने‎‎गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना‎बदनापूर येथे घडली. राणी साहेबराव नाईकवाडे असे मृत तरुणीचे‎नाव आहे. राणी ही विज्ञान शाखेची पदवीधर होती. तिने काही स्पर्धा‎परीक्षा दिल्या होत्या. आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळत‎नाही. या विवंचनेत तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या‎केली, अशी माहिती मुलीचे नातेवाईक व सरपंच सोपान नाईकवाडे‎यांनी दिली आहे.‎ पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुणे येथे एका खासगी कंपनीत‎जॉब मिळविला होता. दरम्यान, राणी ही काही दिवसांपूर्वी पुणे येथून‎बदनापूरला आई-वडिलांकडे आली होती. यातच तिने हे टोकाचे‎पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरूणीच्या‎पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.‎ ‎मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बीड‎‎तालुक्यातील जिरेवाडी येथे तरुणाने गळफास घेत‎‎आत्महत्या केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी‎घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची‎नोंद करण्यात आली.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article