माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती फलकाचा अवमान:भीमसैनिकांनी दिली कोपरगाव बंदची हाक; बाबासाहेबांच्या स्मारकापुढे ठिय्या आंदोलन

3 hours ago 2
कोपरगाव शहरात माता रमाई आंबेडकर जयंतीच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक व महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्मारकापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, माता रमाबाई आंबेडकर यांची शुक्रवारी देशभरात जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी कोपरगाव शहरातील नगरपालिकेच्या माधवबागेपुढे एक फलक लावण्यात आला होता. अज्ञात समाजकंटकांनी या फलकाचा अवमान केला. त्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी शहरात पसरली. काही वेळातच घटनास्थळी भीमसैनिकांची मोठी गर्दी झाली. त्यांनी लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापुढे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आंदोलकांची कोपरगाव बंदची हाक आंदोलकांनी या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव बंदचीही हाक दिली आहे. यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. बंदमुळे शहरातील बस स्थानक बंद करण्यात आले आहे. शहरातील खासगी वाहन चालकांनीही आपली वाहने बंद ठेवली आहेत. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशी अडकून पडलेत. खबरदारी म्हणून शहरात डीवायएसपी शिरीष वमने, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पोलिस निरीक्षक संदीप कोळी आदींच्या नेतृत्वात येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलकांनी माता रमाईंच्या फलकाचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परभणीत झाली होती दंगल उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाचा अवमान झाला होता. त्याचे परभणीसह राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. या दंगलीनंतर पोलिसांनी राबवलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक भीमसैनिकांना अटक केली होती. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सूर्यवंशी यांचा नंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर चौफेर टीका सोसावी लागत आहे. हे ही वाचा... मनोज जरांगेंनी बदलली आंदोलनाची दिशा:आंतरवाली सराटीत साखळी उपोषण करत थेट मुंबईत आंदोलन; फडणवीसांवर एकेरी शब्दांत टीका जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आपल्या आंदोलनाची दिशा काहीशी बदलली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर येत्या 15 तारखेपासून आंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू करण्यासह मुंबई या राज्याच्या राजधानीतही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article