मानवता सर्वोच्च, धर्म-वंश नाही:राजमोहन गांधींचा सिंबायोसिस विद्यापीठात मोलाचा संदेश

2 hours ago 3
पुणे - महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी यांनी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात दिलेल्या भेटीदरम्यान मानवतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, आजच्या अशांत जगात वर्चस्ववादी प्रवृत्ती वाढत असून ती सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. राजमोहन गांधी यांनी विद्यापीठातील कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय आफ्रिकन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गांधी म्हणाले कि, भारत हा हिंदू, मुस्लिम, यहूदी, ख्रिश्चन या सर्वांसाठी आहे आणि सर्वाना समान हक्क असणे हे महत्वाचे आहे. हक्कांची समानता खूप महत्त्वाची आहे. वंश आणि धर्म सर्वोच्च नाहीत तर मानवताच सर्वोच्च आहे.आज जगात रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधांची प्रचंड कमतरता आहे परंतु ही एक संधी म्हणून घेतल्यास भारत हा जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक डॉक्टर, परिचारिका आणि सहयोगी कर्मचारी निर्माण करू शकतो. लाखो भारतीय शारीरिक आणि मानसिक आरोग्याने देखील त्रस्त आहेत त्यामुळे हे कुशल वैद्यकीय मनुष्यबळ आपल्या देशातील जनतेला अत्यंत उपयुक्त ठरेल असे गांधी म्हणाले. डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले कि, एक जीवशास्त्रज्ञ असल्याने, मला राजमोहन गांधींमध्ये महात्मा गांधी आणि सी. राजगोपालचारी यांच्यातील गुणसूत्र दिसतात. मी आज महात्मा गांधींना सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये त्यांच्या नातवाच्या रूपात पाहतोय आणि हा खरोखरच आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.जगभरातील लोकांना एकत्र आणणे हे केवळ शिक्षणाच्या साहाय्याने शक्य आहे, त्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. लोकांचे व त्यांच्या मनांचे जागतिकीकरण वसुधैव कुटुंबकमच्या विचारसरणीद्वारे निश्चित साध्य करता येईल असे देखील डॉ. मुजुमदार पुढे बोलताना म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article