मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बळीराजा मोफत वीज योजनेची अंमलबजावणी:2750 कोटी रुपये महावितरणला अदा, शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

2 hours ago 1
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 हजार 750 कोटी रुपयांचे वीजबिल सरकारने महावितरणला अदा केले. तसेच पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. यावेळी ‍शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपांचे चालू बिल भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे. आगामी पाच वर्षे सरकार शेतकऱ्यांचे साडेसात एचपीपर्यंतच्या पंपांचे चालू बिल भरेल असा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने एप्रिल ते जून या कालावधीच्या बिलापोटी 2 हजार 750 कोटी रुपये महावितरणला अदा केल्यामुळे शेतकऱ्यांना महावितरणकडून पावत्या पाठविण्यात येत आहेत. दहा लाख पंप देणार - फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना दहा लाख पंप देण्यात येणार आहेत. केवळ दहा टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के भरावा लागेल. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. शेतकऱ्यांना स्वतंत्र आणि हक्काचे सिंचनाचे साधन सौर कृषी पंपामुळे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 25 वर्षे वीज‍बिल नाही. पाच वर्षांत पंप बिघडला तर दुरुस्त करून मिळणार आहे. तसेच चोरीस गेला ‍किंवा मोडतोड झाला तर त्याचा विमा सरकारने काढला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आजतागायत 2 लाख 8 हजार 935 सौर पंप मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 1 लाख 67 हजार 155 शेतकऱ्यांनी आवश्यक रकमेचा भरणा केला आहे. त्यापैकी 60 हजार सौर पंप आस्थापित करण्यात आले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर ‍जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्वाधिक पंप या ‍जिल्ह्यात आस्थापित करण्यात आले आहेत. साठ हजार पंपाचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बटण दाबून आतापर्यंत शेतात बसविलेले 60 हजार सौर कृषी पंप रिमोटद्वारे चालू करून योजनेचे लोकार्पण केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article