कमी केलेली मतदारांची नावे मतदान यादीत समाविष्ट करावीत यासाठी मा.आ.विजयराव भांबळे व खा.संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले.Pudhari Photo
Published on
:
16 Oct 2024, 2:09 pm
Updated on
:
16 Oct 2024, 2:09 pm
जिंतूर:- जिंतुर- सेलू मतदार संघातील राजकीय हेतूने कमी केलेली ४००० मतदारांची नावे तात्काळ मतदान यादीत समाविष्ट करावीत यासाठी मा.आ.विजयराव भांबळे व खा.संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जिंतूर - सेलू मतदार संघात ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे अशा ४००० मतदारांची नावे भाजपच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ७ नंबरचा फॉर्म परस्पर दाखल करून मतदार यादीतून कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बाहेरच्या राज्यातील व इतर जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या लोकांची नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत वाढविण्याचे काम सुरू केले आहे. महाविकास आघाडीच्या विचारांच्या मतदारांची नावे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हयात असणाऱ्या मतदारांची नावे मयत यादीत टाकून नावे कमी केली जात आहेत.
तसेच सेलू व जिंतुर तालुक्यासह सेलू शहर व जिंतुर शहरात अशा प्रकारचे प्रयत्न करणे सुरू आहेत. भाजपचे नेते अशा प्रकारचे प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. सेलू जिंतुर मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात नावे कमी करण्याचा प्रयत्न होत आहे तो होऊ नये व बोगस नावे यादीत टाकण्यात येऊ नये. अन्यथा महाविकास आघाडी कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे महविकास आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी खा.संजय (बंडू) जाधव, मा.आ.विजयराव भांबळे, विनायकराव पावडे आदि उपस्थित होते.