वानेगाव येथील गिरजा नदीवरील पुलाचे काम लवकर पूर्ण करा:शेतकऱ्यांचे फुलंब्री तहसील कार्यालयासमोर उपोषण, ग्रामस्थ आक्रमक

2 hours ago 1
तालुक्यातील वानेगावच्या गिरजा नदीलगत पुलाचे व रस्त्याचे काम तत्काळ चालू करा, या प्रमुख मागणीसाठी वानेगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (३ फेब्रुवारी) रोजी फुलंब्री तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील वानेगाव येथील गिरजा नदीवर नवीन झालेल्या पुलाच्या उत्तरेकडील बाजूचे काम अपूर्ण असून ठेकेदार व अधिकारी ऐकत नसल्याने सदरील ठिकाणचे काम अपूर्ण असल्यामुळे या रस्त्याकडील सर्व शेतकऱ्यांनी रस्ता तत्काळ करुन द्यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांंना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता, परंतु निवेदन देऊनही कुठलीही कारवाई झाली नसल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले. वानेगाव येथील गिरजा नदीवर पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून नवीन झालेल्या पुलाच्या उत्तरेकडील बाजूच्या रस्त्याचे काम अपूर्ण असून सदरील ठिकाणी ठेकेदार यांनी तात्परते जाण्या-येण्यासाठी रस्ता तयार करून दिलेला आहे, परंतु सदरील रस्त्यावरून शेतकऱ्याचे उसाचे ट्रक व ट्रॅक्टर या रस्त्यावरून जात नाही त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी ठेकेदार व अधिकारी यांना वारंवार सांगून सुध्दा त्यांनी सदरील रस्त्याचे काम केलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर गिरजा नदीवर पूल झाल्याने नदीला पूर आल्यानंतर शिरोडी, डोंगरगाव, शेलगाव, ममुराबाद व इतर गावांचा संपर्क तुटतो यासाठी गिरजा नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी सुभाष गायकवाड, भागाजी भोकरे, अशोक भोकरे, गणेश गायकवाड, पप्पाजी जाधव, बालू गायकवाड, मिलिंद जाधव, ञिंबक गायकवाड, नारायण गायकवाड, गोविंद भोकरे, पप्पू भोकरे, कारभारी दांगोडे, दत्तू दांगोडे, जगन्नाथ शेळके, कृष्णा शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले. दरम्यान उपोषणस्थळी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मात्र उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासन द्या मग उपोषण मागे घेतो, असा पवित्रा घेतला. मात्र अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन न देता रित्या हाती परत गेले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सदरील अधिकारी यांच्यावर रोष व्यक्त करत हे उपोषण पुढे सुरूच ठेवले आहे. मागील महिन्यात दिले होते तहसीलदारांना निवेदन मागील महिन्यात तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांना संबंधित शेतकऱ्यांनी हा रस्ता व पूल तत्काळ दुरुस्त करावा नसता ३ फेब्रुवारीला सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article