विरोधी पक्षनेता कोण, याची चिंता आता महायुतीने करावी:आमदार बाळासाहेब थोरात यांचा खोचक टोला

2 hours ago 1
श्रीरामपूर प्रत्येकाची राजकीय इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षा असते, हे खरेच आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. भावी मुख्यमंत्र्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महायुतीने महायुतीने आमची चिंता करण्यापेक्षा त्यांचा भावी विरोधी पक्षनेता कोण, याची चिंता करावी, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना मारला आहे. श्रीरामपूर येथे श्रीरामपूर व राहुरी काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित संकल्प मेळाव्यासाठी ते आले असता पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे हेही उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या धोरणावर टिका करताना आमदार थोरात म्हणाले, सध्या महायुतीकडून राज्याची लूट चालू आहे. रोज शेकडो अध्यादेश काढले जात आहेत. रोज रात्रंदिवस सर्वत्र छपाई सुरू आहे. राज्यामध्ये माणसं उपाशी आहेत. रस्ते धड नाही, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, पुरेशी वीज नाही, शाळांना शिक्षक नाहीत, एसटी खिळखिळी झाली आहे, त्या बदलल्या पाहिजे. असे असताना जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च केला जात आहे. चार दिवसांवर आचारसंहिता आली तरीही सोशल मीडियासाठी हजारो कोटी रुपयांचे टेंडर काढले जात आहे. राज्याची तिजोरी खिळखिळी केली जात असून तिची सर्रासपणे लूट सुरू आहे. त्यामुळे जनता सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री पवार महायुतीला बोजड झाले अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला बोजड झाली आहे. अजित पवार खटपटीचे राजकरण करतात. भविष्यात बघू काय काय होते, असेही आमदार थोरात यांनी सांगितले. श्रीरामपूर येथे बोलताना बाळासाहेब थोरात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article