अंजनगावातील बांगलादेशी-राेहिग्यांना जन्मदाखले वितरित केल्याचे प्रकरण:28 दिवसानंतरही चौकशी अहवाल आला नाही, सोमय्यांची नाराजी

2 hours ago 1
भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी महिनाभरापूर्वी बांग्लादेशी, रोहीग्यांना अंजनगाव सुर्जी तहसीलमधून बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात जन्म दाखले देण्याचा आरोप केला होता. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी दर्यापूर एसडीओंच्या अध्यक्षतेसाठी चौकशी समिती नेमली, मात्र २८ दिवसानंतरही चौकशीचा अहवाल न आल्यामुळे सोमय्या यांनी जिल्हाप्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी गोड बोलतात, हे प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचेही ते म्हणाले. अंजनगाव सुर्जी तहसीलमध्ये १,४८४ अर्ज आलेले आहेत. त्यापैकी ५८५ जन्मदाखले वितरीत झाले असून, उर्वरीत दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहेत. एकही अर्ज अंजनगाव तहसील कार्यालयाने फेटाळला नाही. बांग्लादेशी व रोहीग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले वितरीत करण्याचा नियोजित घोटाळा महाराष्ट्रात सुरू आहे. संपुर्ण राज्यात २ लाख २३ हजार अर्ज आले आहेत. यातही यातील सर्वाधिक अर्ज ५४ शहरात आले आहेत. त्या ५४ शहरांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शहरांचे प्रमाण अधिक आहे. विदर्भात अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत प्रमाण जास्त आहे. काही तहसीलदारांनी जन्मदाखला देण्यापूर्वी केवळ आधार कार्डच्या आधारे जन्मदाखले दिलेले आहेत. संबधितांकडून इतर कागदपत्रांची मागणी केली नाही किंवा पडताळणी केली नसल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे. डॉ. सोमय्या यांनी ९ जानेवारीला अंजनगाव सुर्जी तहसीलमधून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले दिल्याचा आरोप केला होता. त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्यापूर उपविभागीय उर्वरित. पान ४ अंजनगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचलेले डॉ. किरीट सोमय्या यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. ही चौकशी नगरपालिका, पोलिस आणि महसूल अशा तीन यंत्रणांना मिळून करावयाची आहे. कागदपत्रांची तपासणी, स्थळपाहणी आदी बाबींमुळे ती वेळखाऊ बनली आहे. दरम्यान चौकशी समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून, लवकरच अहवाल आमच्याकडे येईल. त्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार दोषींवर कारवाई केली जाईल. दरम्यान सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते आरोप करु शकतात. १९३९ ला शाळा सोडली अन् टीसी १९२३ मध्ये दिली डॉ. सोमय्या यांनी एक प्रकरण मांडताना सांगितले कि, जन्मदाखला मागणी करणाऱ्या एका व्यक्तीचा जन्म १९३२ मध्ये झाला. त्याने १९३८ मध्ये शाळेत प्रवेश घेतला आणि १९३९ मध्ये शाळा सोडली. मात्र त्याला शाळा सोडल्याचा दाखला संबधित शाळेकडून १९२३ मध्ये मिळाला आहे. देशात अशी कोणती शाळा आहे कि, त्यांच्याकडे १९३९ चे रेकॉर्ड उपलब्ध आहे.यावरुन अंदाज येतो कि, कागदपत्र कसे मिळवले जात आहे. या प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयातील काही कर्मचारी, काही एजंटसुद्धा सहभागी असल्याचे सोमय्यांनी सांगितले. दरम्यान काही प्रकरणात जोडलेल्या कागदपत्रांवर खोडतोड आहे असेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article