अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहिल्यास विकासाला गती येईल:गंगापूर तहसील कार्यालयात आ. बंब यांनी घेतला आढावा

3 hours ago 1
तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यास प्राधान्य दिल्यास तालुक्याच्या विकासाला गती येईल, असे मत आ. प्रशांत बंब यांनी व्यक्त केले. गंगापूरच्या नवीन तहसील इमारतीमध्ये झालेल्या पहिल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक गावात राहात नसल्याने समाजात विकासाला मर्यादा येत असून, शिक्षणाची फार मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अधिकारी जर गावात जाऊन राहिले तर विकासाला पूरक वातावरण निर्माण होते, असे बंब म्हणाले. यावेळी उपस्थित ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत १५ फेब्रुवारीपासून त्या- त्या गावात राहण्यास जाणार असल्याची ग्वाही दिली. आ. प्रशांत बंब यांनी यावेळी घरकुल योजनेचा लाभ देताना सर्व शहानिशा व सर्वे करून ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांनाच लाभ देण्याच्या सूचना यावेळी केल्या. यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्यासह नंदकुमार गांधिले, संतोष जाधव, भाउसाहेब पदार, रवींद्र चव्हाण, प्रदीप पाटील, मारूती खैरे, संदीप बोजवारे, कृष्णकांत व्यवहारे, प्रशांत मुळे, अमोल जगताप, राकेश कळसकर, ज्ञानेश्वर सवई, तलाठी, ग्रामसेवक, अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article