अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी काय?:राज्याचे कृषिमंत्री म्हणतात, 'अनेक महत्त्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल'
2 hours ago
1
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राला अनेक योजना दिल्या आहेत. मात्र, या योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले असल्याचे म्हटले आहे. शंभर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कडधान्य लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जिल्ह्यांचा समावेश करावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. किसान क्रिकेट कार्ड वरील कर्जाची मर्यादा ही पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचाही फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा कृषिमंत्री कोकोटे यांनी केला आहे. या वेळी कोकाटे म्हणाले की, अनावश्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम बघायचे असतील तर एकदा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, असे आवाहन कोकाटे यांनी केले आहे. आपल्याला मिळालेले आरोग्य परमेश्वराने किती चांगले दिले आहे. त्याचा वापर नीट करायचा असेल तर शेतकऱ्यांनी उत्पादन नीट घ्यायला हवे, तर खाणाऱ्याने देखील चांगले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजे. यासाठी प्रचार आणि प्रसाराची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार देखील पावले उचलणार असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाची रक्कम पाच लाख रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल. केंद्र सरकारचा उद्देश हा मोठा आहे. केंद्र सरकार यातून देशभर कृषी खात्याला नव संजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शंभर जिल्हे केंद्राने निश्चित केले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या जिराईत शेती संदर्भामध्ये कडधाने उत्पादनासाठी प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर देखील केंद्र सरकार पुरवणार असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे. यात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जिल्ह्यांचा कसा समावेश होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे देखील कोकाटे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र 70 टक्के भागातील शेती ही जीरायती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतीचा समावेश करण्यात येईल. वास्तविक तुरीचे अनेक नवीन वान बाजारात आलेले आहे. त्या वानातही काही बदल होतो का? यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील कोकाटे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेलं अर्थसंकल्प हा अतिशय सकारात्मक आहे. हा भारताला 22व्या शतकाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामान्य माणसाचे जीवन सुखकर होईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे देखील कोकाटे यांनी म्हटले आहे. किसान क्रिकेट कार्ड वरील कर्जाची मर्यादा ही पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर व्याजाचा दर कमी झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून देखील आमचा प्रयत्न सुरू असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)